पुणे: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे यांनी बैलगाडा शर्यतीच्या श्रेयावरुन शिरुर लोकसभेच्या मैदानात ‘बारी’ धरली आहे. बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी राजकीय चढाओढ सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली. त्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा झाला. खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी निर्णयाचे स्वागत करीत श्रेयही घेण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
विलास लांडे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारच्या प्रयत्नांचे हे यश लाटण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या लोकांकडून पातळी सोडून राजकारण केले जात आहे. ज्यांनी प्रयत्न केलेच नाहीत, ते आज छातीठोकपणे आमच्यामुळे बंदी उठल्याचे सांगत आहेत, असा हल्लाबोल भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला. कारण, शिरुर लोकसभा मतदार संघात बैलगाडा शर्यत हे कार्ड चालणार आहे.
वास्तविक, विद्ममान खासदार अमोल कोल्हे आणि लांडे यांच्यात नाराजी आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लांडे यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आले. डॉ. कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने लांडेंच्या तयारीवर अक्षरश: पाणी फिरले. त्यामुळे लांडे समर्थक राष्ट्रवादीसह डॉ. कोल्हे यांच्यावर नाराज होते. याची परिणीती, विधानसभा निवडणुकीत लांडे यांनी राष्ट्रवादीचे तिकीट नाकारले. यापूर्वीही लांडे यांनी शिरुर लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यावेळी आढळराव पाटील यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे लांडे यांची शिरुरमधून लोकसभेत जाण्याची महत्वाकांक्षी कायम आहे.
… तर लांडे भाजपामध्ये प्रवेश करतील
वास्तविक, लोकसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी आणि पूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यात ‘कॉम्प्रमाईझ’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भोसरीचा खासदार व्हावा. या मुद्यावर लांडगे कधीही लांडे यांना मदत करायला तयार होतील. राष्ट्रवादीकडून डॉ. कोल्हे यांना २०२४ मध्ये पुन्हा तिकीट निश्चित राहणार आहे. मग, लांडे कदाचित भाजपात प्रवेश करतील आणि आमदार लांडगे यांच्या मदतीने दिल्लीत पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Read also:
- महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
- छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होणं, ही छोटी गोष्ट; मुख्यमंत्र्याचा संतापजनक वक्तव्य
- रामदास कदमांच्या गंभीर आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल
- जो प्रयत्न अमरावतीत झाला तो पुन्हा झाला तर सोडायचं नाही; राज ठाकरेंचे आदेश