मुंबई : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची नाराजी आणि रत्नागिरीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना समर्थकांना डावलल्यामुळं नाराज असल्यानं शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज, मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा कट आखला गेला, असा आरोप कदम यांनी केला. उद्धव ठाकरे हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख आहेत की, अनिल परब असा सवाल त्यांनी केला.
उद्धवा अजब तुझे सरकार; स्वतःच्या पक्षालाच दिलाय निधी वाटपात सर्वात कमी निधी
शिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची चर्चा होती. मात्र, मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, पण मुलं निर्णय घ्यायला मोकळी आहेत, असेही रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेतून माझी हकालपट्टी केली तरी, मी शिवसैनिक म्हणून जगेन, असंही ते म्हणाले.
महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबीच्या जाळ्यात..!
माझा मुलगा योगेश याला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर आणलं होतं. संजय कदमला तिकीट मिळावं म्हणून वारंवार प्रयत्न केले. पण माझ्या मुलाला तिकीट मिळालं. तो निवडून आला. परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी एकदाही माझ्या मुलाचा फोन उचलला नाही. उलट संजय कदमशी सातत्याने संपर्क ठेवला. या भागात मनसेचे वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठी घालण्याचं काम परब यांनी केलं. अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
Read also:
- जो प्रयत्न अमरावतीत झाला तो पुन्हा झाला तर सोडायचं नाही; राज ठाकरेंचे आदेश
- शिवसेना नेत्याची तडकाफडकी परिषद; उद्धव साहेब आम्हाला ही निष्ठेची ही भेट दिली का? रामदास कदमांना अश्रू अनावर
- आमच्या टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतो; क्रिकेटच्या मैदानावर जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अचानक रात्री विधानभवनात मारली धडक; विधानभवनाची केली पाहणी
- बेळगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; मराठी भाषिकांचा संघर्ष पेटणार, आज बंदची हाक