बेळगाव : कर्नाटकच्या सीमेवर पुन्हा एकदा आता मराठी भाषिकांचा संघर्ष पेटणार आहे. बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवामन केल्याची व्हिडिओ समोर आली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर आता ती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बेळगाव आणि परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाला असून शिवप्रेमी नागरिकांनी धर्मवीर संभाजी चौकात जमून सर्व रस्ते बंद केले आहेत.
भाजपला सुरुंग: भुसावळमधील तब्बल २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
या घटनेच्या निषेधार्त ठिकठिकाणी दगडफेक करण्यात आली आहे. धर्मवीर संभाजी महाराज चौकात पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. आज सकाळी बेळगाव बंदची हाक पुकारण्यात आली आहे. सकाळी १० वाजता शिवाजी उद्यानापासून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही – अनिल परब
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण हिंदुस्थानचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच राज्यांच्या पुतळ्याला अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार समोर येत आहेत. गेल्या वर्षी मनगुत्ती येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटविण्यात आला होता. तेव्हापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम कन्नड संघटनांकडून केले जात आहे.
अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते; भाजप नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास कोणत्यातरी समाजकंटकाने सदाशिनगर बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून महाराजांचा अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. आज संपूर्ण बेळगाव बंदची हाक पुकारण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये या घटनेच्या निषेधार्त कन्नडी लोकांची हॉटेल्स शिवसैनिकांनी रात्रीतून बंद केली आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे आम्ही उभे आहोत अशी भूमिका देखील घेतली आहे.
Read also:
- महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबीच्या जाळ्यात..!
- उद्धवा अजब तुझे सरकार; स्वतःच्या पक्षालाच दिलाय निधी वाटपात सर्वात कमी निधी
- मी त्या गुजरातमधून आलोयं, जिथं ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात; हार्दिक पटेलांची टीका
- राज्यात सत्ता असतानाही एका नगरपंचायतीच्या जागेसाठी संघर्ष करणे, यातच राष्ट्रवादीचा पराभव – चंद्रकांत पाटील
- अशोक चव्हाण बरोबर बोलतायं, काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीची सत्ता; बाळासाहेब थोरातांचा इशारा