अहमदनगर : कर्जत जामखेड नगरपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडमधील वातावरण चांगलेच पेटलेले दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढाई कर्जमध्ये बघायला मिळणार आहे.
एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी आयोगाला विचार करावाच लागेल – बाळासाहेब थोरात
फॉर्म माघारी घेण्याच्या वेळी भारतीय जनता पक्षातील ४ उमेदवारांनी अचानक फॉर्म मागे घेतल्याने खळबळ माजली होती. यानंतर माजी मंत्री राम शिंदे हे कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते . त्यांनी गोदड महाराज देवस्थानाच्या बाहेर मूक आंदोलन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दहशतीच्या जोरावर उमेदवारांना धमकावत आहे असा देखील आरोप राम शिंदेनी केला होता.
राज्य सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळला; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार
आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आता या निवडणुकीवर भाष्य केले आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपा उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर आली हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे.
केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नाही; छगन भुजबळांचा धक्कादायक दावा
त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे, राज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री आहे, सत्ता त्यांचीच आहे मात्र त्यांना नगरपंचायतीच्या एका एका जागेसाठी इतका संघर्ष करावा लागत आहे, हे अशोभनीय आहे. याचा अर्थ असा निघतो की भारतीय जनता पक्षाचेच विजय या निवडणुकीत झाला आहे. सत्तेचा दुरुपयोग, धनशक्ती विरोधात एकवटलेली जनशक्ती आपल्याकडे असल्याने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा, असे माझे तेथील कार्यकर्त्यांना आवाहन आहे असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले आहेत.
Read also:
- अशोक चव्हाण बरोबर बोलतायं, काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीची सत्ता; बाळासाहेब थोरातांचा इशारा
- अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते; भाजप नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा
- 20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही – अनिल परब
- भाजपला सुरुंग: भुसावळमधील तब्बल २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल – नितीन राऊत