कुडाळ : ईडी, सीबीआय किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या राज्य सरकारमधील काही मंत्री आणि इतर नेत्यांविरोधात कारवाई केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कधीही अटक होऊ शकते, असे खळबळजनक विधान माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कुडाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनो, आता सहनशीलता संपत आलीयं, आमचा अंत पाहू नका; अजित पवारांचा इशारा
जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “जिल्हा बँक महाविकासआघाडीच्या हातातून कधीच गेली आहे. म्हणून त्यांना अजित पवारांकडून एक्सटेन्शन मिळाले. अजित पवारांनी जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी मदत केली. आता निवडणूक होईल, तेव्हाही आम्हीच जिंकणार आहोत. पण त्यंना एवढा काळ का लागला, कारण त्यांना ती बँक टिकवायची कशी, हेच कळलेलं नाही”, असं निलेश राणे म्हणाले.
एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी आयोगाला विचार करावाच लागेल – बाळासाहेब थोरात
“त्यांनी जे काही धंदे करून ठेवलेत, ते उद्या आम्ही निवडून आल्यावर उघड होणार. अजित पवार आज बाहेर आहेत उद्या आतही जातील. ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या अनेक केसेस आहेत. त्यामुळे ते कधीही आत जातील. म्हणून अजित पवार त्यांना (स्थानिक नेत्यांना) आता काही वाचवू शकणार नाहीत”, असं निलेश राणे म्हणाले.
Read also:
- 20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही – अनिल परब
- भाजपला सुरुंग: भुसावळमधील तब्बल २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल – नितीन राऊत
- केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नाही; छगन भुजबळांचा धक्कादायक दावा
- राज्य सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळला; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार