औरंगाबाद : कोरोना आणि लॉकडाऊन काळात सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच वीज खात्याकडून अनेक नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल देण्यात आले. यानंतर वीज बिल माफ करावं अशी मागणी होऊ लगाली. अनलॉक झाल्यानंतर ग्रामीण भागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळलं. यामुळे थकीत वीजबिल माफ करा अशी मागणी होत आहे. मात्र, राज्यात कुणालाही फुकटात वीज मिळणार नसल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
ओबीसी आरक्षणासाठी लवकरात लवकर कोर्टात धाव घ्या; पंकजा मुंडेंची आर्त हाक
औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, वीज कुणालाही फुकटात मिळणार नाही. वीजेचा वापर कुणी करत असेल तर त्यांना वीजेचं बिल भरावं लागणार आहे. महावितरण काही फुकटात वीज घेत नाही किंवा कंपन्या महावितरणला फुकटात वीज देत नाही. ज्या कंपन्या वीज निर्माण करतात त्यांना कोळसा विकत घ्यावा लागतो, बँकांकडून कर्ज घ्यावं लागतं. त्यांना पैसा आवश्यक आहे. महावितरणकडे जर पैसेच राहिले नाही तर महावितर बंद होईल. राज्यात महावितरणने काम केले नाही तर खाजगी कंपन्या येथे येतील.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मला सुरक्षित असल्याची जाणीव होतेयं; रुपाली पाटलांच्या भावना
नितीन राऊत पुढे म्हणाले, सरकार वर अनेक संकट आली. वीज थकबाकी मागच्या सरकारने 5 वर्ष बिल दिले नाहीत आणि तेच आपल्या माथ्यावर आलं आहे. मागच्या सरकारची थकबाकी आहे. चांगली वीज बिल वसुली करेल त्याला बक्षीस द्यावे लागेल. महापारेशन आणि महानिर्मिती मी आलो तसं फायद्यात आली आहे. फिडर बंद केले तर शेतकाऱ्यांसोबत महावितरण चे नुकसान होतं, शेतकऱ्यांना स्मार्ट मीटर लावले की समस्या मिटेल.
Read also:
- केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नाही; छगन भुजबळांचा धक्कादायक दावा
- राज्य सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळला; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार
- एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी आयोगाला विचार करावाच लागेल – बाळासाहेब थोरात
- एसटी कर्मचाऱ्यांनो, आता सहनशीलता संपत आलीयं, आमचा अंत पाहू नका; अजित पवारांचा इशारा
- आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे; अशोक चव्हाण यांच वक्तव्य