पुणे : महिला सुरक्षित असणं फार गरजेचं आहे. त्यांना आवश्यक ते पाठबळ असण गरजेचं आहे. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सुरकेचा श्वास सोडला. मला राष्ट्रवादीत सुरक्षित वाटू लागले आहे. पुर्णत: रिल्यक्ष आहे. मला छान वाटू लागलायं. कारण अजित पवार यांनी मला लागेत ते पाठबळ देण्याचा विश्वास दिला, अशा भावना रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर व्यक्त केल्या.
ओमायक्रॉनचा धोका: मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
त्या म्हणाल्या, राष्ट्रवादीमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे हे महिलांचे प्रेरणास्थान आहे. महिलांसाठी भक्कम आणि खंबीर असे नेतृत्व आहे. त्या आदर्श नेत्या आहेत. राहिला विषय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तर त्या माझ्या मैत्रिण आहेत. विशेषत दोन खंबीर महिला नेतृत्व असताना माझ्या सारख्या आणखी एका महिला नेतृत्वाची भर पडल्याने पक्षाला आणि महिला नेतृत्वाला आणखी बळ येणार आहे. त्यामुळे, अधिक जोमाने आम्ही काम करू, असेही त्या म्हणाल्या.
“किरीट सोमय्या यांनी माझी माफी मागावी अथवा १०० कोटी भरावे”; परबांचा दम
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मनसेतील लोकांनी मला हे सांगू नये की मी काय करायला हवं. मी भित्री आहे, पळपुटी आहे असं तर त्यांनी बोलूचं नये. जेव्हा माझ्यावर पक्षात अन्याय होत होता तेव्हा त्यांना पक्षाकडून विचारातही घेतलं जात नव्हतं त्यामुळे त्यांनी आता मला तोंड उघडायला लावू नये. वसंत मोरे असतील किंवा नगरसेवक साईनाथ बाबर असतील हे दोन्ही माझे भाऊ आहेत. भाऊ या नात्याने आता त्यांनी काहीही आरोप करू नये आणि मला काही बोलायला लावू नये अशीच माझी इच्छा आहे असं देखील ठोंबरेंनी म्हटलं आहे. अन्यथा त्यांना जसं बोलता येत तसं मला देखील बिनधास्त बोलता येतं हे त्यांनी विसरू नये.
Read also:
- ओबीसी आरक्षणासाठी लवकरात लवकर कोर्टात धाव घ्या; पंकजा मुंडेंची आर्त हाक
- म्हाडा, टीईटी पेपर फुटी प्रकरण: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक
- एसटी आंदोलनाचा अनिल परबांनी घेतला धसका; परबांच्या सुरक्षा व्यवस्थेत झाली मोठी वाढ
- नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी आमदार संजय पवारांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- जर मी बिनधास्तपणे बोलायला लागले तर अवघड होईल; रुपाली पाटील यांचे वसंत मोरेंना थेट उत्तर