मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दीड महिन्यापासून बेमुदत संप सुरु आहे. एसटीचे विलगीकरण आणि पगारवाढ या दोन मुद्द्यांवर एसटीचे कर्मचारी आझाद मैदानात आणि प्रत्येक जिल्ह्यातील काही डेपोंमध्ये ठाण मांडून बसले आहेत. सरकारनेही मागील दिवसांमध्ये दोन पाऊले पुढे येत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा घोषणा केली होतीआणि कर्मचाऱ्यांनी संप मिटवण्याची भूमिका घ्यावी असं देखील म्हटलं होतं.
बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
मात्र पगारवाढीचा कोणताही परिणाम आंदोलनावर दिसून आला आहे असं दिसत नाही. सरकारने पगारवाढ करून कामावर हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाढीव पगाराप्रमाणे वेतन दिले आहे. असं असलं तरी देखील ७० हजार कर्मचारी हे अजूनही आंदोलनातच सहभागी आहेत. २० हजार कर्मचारी हे कामावर पुन्हा हजर झाले आहेत.
आता आंदोलकांचे नेतृत्व ऍड. गुणरत्न सदावर्ते करत आहेत. त्यांनी आंदोलनातील रग दोन मोठे नेते सोडून गेले असतानाही तशीच ठेवली आहे किंबहुना आता जास्तच धार त्यांच्यामुळे आंदोलनाला भेटत आहे. दुसऱ्या बाजूला परब यांनी थेट कर्मचाऱ्यांच्या निलंबनास सुरुवात केली आहे. आता आंदोलन जास्त चिघळत असल्याने परबांच्या घराबाहेर आणि इतरही ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. आंदोलन चिघळण्यानंतर परबांनी आता आंदोलनाचा धसका घेतला आहे. परबांचा मुक्काम असलेल्या शासकीय विश्रामगृहांना आता छावणीचे स्वरूप मिळाल्याचे कळत आहे. मागील दोन दिवसांत परब रत्नागिरी जिल्ह्यावर होते.
मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना परबांच्या गाड्याचा ताफा आंदोलना समोरुनच जाणार असल्याने बुधवार आणि गुरुवारी दिवसभर त्यांना पोलिसाचा गराडा कायम होता. एवढंच नाही तर शासकीय विश्रामगृहात तर, तपासणी करूनच आत सोडण्यात येत होते असं देखील म्हटलं जात आहे. एकंदरीत संतप्त आंदोलन कर्त्यांचा परबांनी धसका घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही.
Read also:
- नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी आमदार संजय पवारांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- जर मी बिनधास्तपणे बोलायला लागले तर अवघड होईल; रुपाली पाटील यांचे वसंत मोरेंना थेट उत्तर
- “किरीट सोमय्या यांनी माझी माफी मागावी अथवा १०० कोटी भरावे”; परबांचा दम
- ओमायक्रॉनचा धोका: मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
- शिवसेना खासदारानेच कोरोना नियमांचा उडविला फज्जा; ठाकरे सरकार हेमंत पाटलांवर कारवाई करणार का?