मुंबई : महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल हे म्हणणाऱ्या भाजपलाही काही बोलण्यासाठी उरलं नाही. कारण या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनीही हे वक्तव्य केलं की आता हे सरकार पडेल असं वाटत नाही. अशात काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी केलेली वक्तव्य ही चर्चेचा विषय ठरत आहेत, सगळ्यांच्या भुवया उंचावणारी ठरत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनो, आता सहनशीलता संपत आलीयं, आमचा अंत पाहू नका; अजित पवारांचा इशारा
अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे सरकारला म्हणजेच शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थेट इशाराच देऊन टाकला आहे. अशोक चव्हाण यांनी मंठा या ठिकाणी असलेल्या सभेत बोलताना असं म्हटलं आहे की काँग्रेसमुळेच सरकार आहे.
एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी आयोगाला विचार करावाच लागेल – बाळासाहेब थोरात
‘महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा वाटा आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही (काँग्रेस) आहोत म्हणून सत्ता आहे. राज्यात विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करतं आहे. स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेतले तरी हरकत नाही. राज्य व्यवस्थित चाललं पाहिजे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाने आमची निराशा झाली. भाजपला राज्यातील आणि देशातील आरक्षण संपवायचं आहे.’
राज्य सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळला; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार
‘महाविकास आघाडीबाबत आणि काँग्रेसबाबत जे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यात चुकीचं काहीच नाही. काँग्रेस हा सरकारमधील घटक पक्ष आहे. प्रत्येक घटक पक्षाचं सरकारमध्ये सारखंच स्थान आहे. जे इतर इतर दोन पक्षांचं महत्त्व आहे तेच काँग्रेसचं महत्त्व सरकारमध्ये आहे.’ असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सूचक इशारा दिला आहे.
Read also:
- अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते; भाजप नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा
- 20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही – अनिल परब
- भाजपला सुरुंग: भुसावळमधील तब्बल २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल – नितीन राऊत
- केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नाही; छगन भुजबळांचा धक्कादायक दावा