मुंबई : राज्य सरकारनं मुंबई व उपनगरांत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक, शिक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, शिक्षकांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील राज्य सरकारनं मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे पत्र पाठललं आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
शिक्षकांना लोकलमध्ये प्रवेशाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. आता राज्य सरकारनं ही मागणी मान्य केली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईत सार्वजनिक वाहतूक बंद झाली होती. मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक फक्त कोरोना योद्धयांसाठीच सुरू होती. मात्र अशाही परिस्थितीमध्ये उत्तरपत्रिका तपासणे, परीक्षांचे निकाल जाहीर करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना तारेवरची कसरत करून शाळा गाठावी लागत होती.
मात्र, आता नुकताच शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना 50 टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यातच येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये येता यावे, यासाठी राज्य सरकारच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे.
Read Also :
भाजपच्या ‘या’ नेत्याने धरला काँग्रेसचा ‘हात’ भाजपला पडले मोठे खिंडार
मुख्यमंत्रीपद मिळाल्यास नितीश कुमारांनी त्याचं श्रेय शिवसेनेला द्यावं : संजय राऊत
काय बोलताय? अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांची ‘नात’ नागपूरकर?
फक्त ‘या’ कारणामुळे आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमारांना झटका दिला: चिराग पासवान
स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन…”, राणेंची टीका