मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे भटक्या, विमुक्त जाती-जमातींविरोधातील सरकार आहे, असा आरोप भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे. धनगर आरक्षणाबाबत पडळकर यांनी आज पारंपारिक वेशभूषेत हटके आंदोलन केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले, वारंवार विनंती आणि मागणी करुनही सरकार धनगर आरक्षणाबाबत गंभीर नाही. सरकार जर आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही तीव्र स्वरुपातील आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे असं म्हणत भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. सर्व समित्या कोमामध्ये आहेत म्हणत लोकल सुरु करता येते तिथं करोनाचा त्रास होता नाही का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. राज्याचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु असून यावेळी सभागृबात ते बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरला सभागृहातील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की, “नियमाच्या पुस्तिकेनुसार पहिल्या अधिवेशनाच्या आत हे व्हायला हवं. विधानपरिषदेची नावं येत नाहीत म्हणून समित्यांचं काम होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला यामध्ये राजकारण सुरु आहे हे कळू द्या.लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे”.
Read Also :
‘रवी राणांचा पोशाख पाहून अध्यक्ष भडकले आणि त्यांना बाहेर काढले’
गोपीचंद पडळकर यांचं धनगरी वेष परिधान करुन ढोल वाजवत आंदोलन
… तर या शेतकऱ्यांशी चर्चा का करत आहात ? चिदंबरम यांचा मोदी सरकारला खोचक सवाल