मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानभवनात दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्भा भरवण्यात येतील अशी घोषणा केली. तसेच गोविंदाना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यांनंतर पुण्यात, मुंबईत स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर विरोध दर्शविला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“श्वेता महालेंच्या कार्यक्रमात तुफान हाणामारी, घाईघाईत दहीहंडी फोडली”
“सरकारी, निम सरकारी नोकरी देताना ऑलम्पिक संघाची मान्यता लागते. याचा तात्पुरता भावनिक विचार करून चालणार नाही, त्याने गोविंदांची देखील फसवणूक केल्यासारखे होईल. आरक्षण असतानाही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अद्याप सरकारी नोकरी नाही ज्यांनी देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं, त्या दत्तू भोकनळ, कविता राऊत, अंजना ठमके यांना नोकरी द्या. पण त्यांना अद्याप नोकरी नाही. गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र आहे त्यांना आधी न्याय द्या.” असं राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे.
“तर उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कवडीची देखील किमंत राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस
दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला आहे. हा निर्णय आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा. असं देखील रोहित पवारांनी बोलून दाखवलं.
“मुख्यमंत्री झाल्यावर असं भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
‘पुण्यातल्या खड्डेमय रस्त्यांवर गाडी चालवणे’ याला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा. पुण्यातील सर्व वाहनचालकांना सरकारी नोकरीत किमान 25% आरक्षण मिळावे. असा खोचक टोला पुणे शहाराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. गावाकडे गोट्या, विटीदांडू, तसेच अनेक खेळ खेळले जातात. मग उद्या उठून ते देखील आरक्षण मागतील, तसेच चार चार वर्ष ज्यांनी अभ्यास केला आहे, जर त्यांच्या हिश्याच्या नोकऱ्या असे गोविंद पथक दोन तासांचा खेळ दाखवून घेऊन जात असतील तर हा निर्णय अत्यंत चूकीचा आहे. राज्यात बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट आहे. त्यात नवीन खेळांची भर पडेल. याला मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय फक्त आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतला आहे. याविरोधात आम्ही रस्त्यावर तसेच गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
Read also
- “आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद, याचा अर्थ जनता आपल्यासोबत”; उद्धव ठाकरे
- “शेलार, दरेकर स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाही अन्..;” पेडणेकरांचा हल्लाबोल
- “गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं, बाबाजी का ठुल्लू,”आदित्य ठाकरेंचा घणाघात
- “देशातील काही महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ
- “सत्ता तुमची पण आमदार मीच, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढू”; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सज्जड दम