पुणे : ‘पीएमआरडीए’च्या पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक ही केवळ काँग्रेसमुळेच बिनविरोध झाली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. काँग्रेसच्या या रणनीतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांतील आघाडीत मीठाचा खडा टाकण्यात आला असून, ही आघाडी होऊ नये, यासाठी काँग्रेसमधील काही व्यक्ती काम करीत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.
हायड्रोजन सोडा, नवाब मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल – आशिष शेलार
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नियोजन समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे लढली असून, त्यात आम्हाला यश मिळणार आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते या निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा आघाडीतील समन्वय अत्यंत चांगल्या प्रकारे राहील, असा दावाही जगताप यांनी केला आहे. काँग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीतील उच्चपदस्थ नेत्यांकडून घेण्यात येईल. मात्र, ‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत आघाडी करण्याची मानसिकता काँग्रेसकडून दाखविण्यात आली नसल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनो प्रवाशांना वेठीस धरू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कळकळीचे आवाहन
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये या निवडणुकीसाठी २२ जागांसाठी २३ अर्ज आले होते. या दोन्हीही महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’चे संख्याबळ पाहता याच तिन्ही पक्षांचे उमेदवार निवडून येणार होते. त्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यातून एक जागा देण्याचा प्रस्ताव त्यांना देण्यात आला होता; तरीही काँग्रेसने एक अर्ज भरून ही बिनविरोध होणारी निवडणूक मतदानाद्वारे घेतली. महाविकास आघाडीत एकवाक्यता असणे यासाठी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांकडून भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र, काँग्रेसमधील काही मंडळींची आघाडीत जाण्याची मानसिकता नसल्याने केवळ दोन-अडीच महिन्यांसाठी असलेल्या या पदासाठी ही निवडणूक होत असल्याची टीका जगताप यांनी केली.
एसटी आंदोलन चिघळले: गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना अटक, मंत्रालयाजवळ पोलिसांचा फौजफाटा
भारतीय जनता पक्ष एकसंधपणे या निवडणुकीला सामोरा गेला आहे. आघाडीतील बिघाडी ही पुणेकरांना लवकर कळली, हे बरे झाले. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे पक्ष आहेत. ते विचारांनी कधीही एकत्र येऊ शकत नाही. शिवाय नियोजन समितीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले.
Read Also :
- देवेंद्र फडणवीसांवर खोटारडे आरोपकरून नवाब मलिक स्वतःची कबर खणत आहेत – चंद्रकांत पाटील
- देशद्रोही ‘नवाब’ हीच तुमची लायकी; पुण्यात नवाब मलिकांचा पुतळा जाळून भाजपच्या वतीने निषेध
- किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? – प्रविण दरेकर
- सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाही; भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा निर्धार
- आम्हाला गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; निलंबित एसटी कामगारांचा सरकारला इशारा