जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला. शिवसेनेचे जवळपास 40 आमदार, 12 खासदारांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सेनेला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना देखील राज्यातून मोठा पाठिंबा मिळत गेला. यातच सुषमा अंधारे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेचच उपनेते पद बहाल केले. याचा फायदा घेत सुषमा अंधारे यांनी बंडखोर आमदारांवर टिकास्त्र सोडलं. त्यांनी प्रत्येक सभांमधून बंडखोर आमदारांचा गद्दार म्हणून उल्लेख केला. त्यामुळेच त्यांची जळगाव येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. यावरून आता राज्यात एकच वाद सुरू झाला आहे.
“हे बा-पांडुरंगा, महाराष्ट्रावर तुझी कृपा कायम ठेव”, आगामी निवडणुकांची वाट सोपी ; अजित पवार
सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्यांच्यावर कडाडून प्रहार करीत आहेत. मात्र जळगाव येथील त्यांच्या महाप्रबोधन सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच काल त्यांच्या भोवती पोलिसांचा मोठा गाडा बघायला मिळाला. तसेच त्यांना जळगावमध्ये नजर कैदेत ठेवण्यात आल्याचा देखील शिवसेनेकडून आरोप करण्यात येत आहेत. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर कडाडून टिका केली आहे.
“राष्ट्रवादी काॅंग्रेसचे 12 नेते फुटले, फक्त मुहूर्त ठरायचा बाकी”
यावर सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, काल माझी सभा नाकारण्यात आली. परंतु मला माझी सभा का नाकारली याचं कारण शेवटपर्यंत कळलं नाही. तसेच माझ्यावर याआधी कोणताही गुन्हा नाही, कुणाची तक्रार नाही. तरीही देखील मला पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार काल माझ्यासोबत घडला. सभेची वेळ संपेपर्येत मला हॉटेलमधून बाहेर पडू दिलं नाही. याची त्यांनी काळजी घेतली. असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच हा सगळा प्रयत्न केविलवाणा आहे. कोंबडं झाकलं म्हणून सुर्य उगवायचा थांबतो ही खुळी कल्पना आहे. तुम्ही अशा प्रकारे आवाज दाबून ठेऊ शकत नाही असंही त्या म्हणाल्या.
“राष्ट्रवादीवर टिका झाली की समजायचं आपण खुप ताकदवान”; जयंत पाटील
दरम्यान, काल शिवसैनिकांकडून जबरदस्ती करून मला सभेला जातं आलं असतं. परंतु मला हा सर्व डावपेच माहित होता की, यावर काही वेगळं घडून आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. तो प्रकार आमच्या लक्षात आला. पण त्यामुळे भाजपला किंवा गुलाबराव पाटलांना हेच अपेक्षित होतं. परंतु मी हे टाळलं. त्यांना मला अडकवण्याचा प्रयत्न होता. परंतु मग मी माझी सभा ऑनलाईन घेतली. असं देखील त्या म्हणाल्या.
Read also
- शिंदे गटाचे 12 आमदार बाद होणार..! सरकार वाचवण्यासाठी फडणवीसांची रणनीती, काॅंग्रेसचे 22 आमदार फुटले..?
- “सरकार कोसळवणं हेच अजित पवारांचे काम, आम्ही फक्त जनतेसाठी..” दिपक केसरकर
- अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांनी केले घरून मतदान..! ९१.१६ टक्के मतदारांनी बजावला हक्क
- मावाळचं राजकारण तापलं..! मामा-भाचे यांच्यात दिवाळीनंतरही लेटर बॉम्ब फटाके
- “आम्ही कधीही विकासकामांमध्ये राजकारण केलं नाही”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला