औरंगाबाद : शिवसेना फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भुंकप आला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांवर निलंबणाची टांगती तलवार कायम आहे. याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसच्या 22 आमदारांना वेट अॅन्ड वॉच भूमिकेत ठेवलं आहे. सरकार कोसळलं की हे काॅंग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
“राष्ट्रवादी काॅंग्रेसचे 12 नेते फुटले, फक्त मुहूर्त ठरायचा बाकी”
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाचे 12 आमदार केव्हाही बाद होऊ शकतात. त्यामुळे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसचे 22 आमदार तयार करून ठेवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच काॅंग्रेसचे 22 आमदार फुटू शकतात. असा खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या मोठ्या बंडानंतर आता राज्यात काॅंग्रेसमध्ये देखील बंड होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
“राष्ट्रवादीवर टिका झाली की समजायचं आपण खुप ताकदवान”; जयंत पाटील
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळालं नसल्याने त्यांचा चेहरा कायम पडलेला असतो. परंतु या पडलेल्या चेहऱ्यामागे फडणवीस हे मोठे डावपेच रचत आहेत. शिंदे गटाचे आमदार बाद झाल्यानंतर सरकारचे नुकसान होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत. शिंदे गटाचे आमदार बाद झालेत की, काॅंग्रेसचे 22 आमदार भाजपसोबत जातील. असंही ते म्हणाले.
धक्कादायक..! शिवसेनेच्या नेत्यांवर गोळीबार..; हल्लाचा व्हिडीओ आला समोर
दरम्यान, तसेच आगामी निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, अशा राजकीय घडामोडीनंतर राज्यात केव्हाही राष्ट्रपती राजवट लागू शकतात. अन् विधान सभेच्या निवडणुका होऊ शकतात. तसेच राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून राज्यपाल कसे काम करतात हे सर्वांना माहिती आहे. असं म्हणत त्यांनी राज्यपालांना देखील टोला हाणला.
Read also
- “सरकार कोसळवणं हेच अजित पवारांचे काम, आम्ही फक्त जनतेसाठी..” दिपक केसरकर
- अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांनी केले घरून मतदान..! ९१.१६ टक्के मतदारांनी बजावला हक्क
- मावाळचं राजकारण तापलं..! मामा-भाचे यांच्यात दिवाळीनंतरही लेटर बॉम्ब फटाके
- “आम्ही कधीही विकासकामांमध्ये राजकारण केलं नाही”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला
- “हे बा-पांडुरंगा, महाराष्ट्रावर तुझी कृपा कायम ठेव”, आगामी निवडणुकांची वाट सोपी ; अजित पवार