मुंबई : हाथरास पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. कलम १८८ अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी धक्काबुक्की झाल्याचे देखील पहायला मिळाले. यावरून आता अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची…रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे असा जोरदार टोला राष्ट्रवादीनं लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की आणि अटक याचा निषेध केला आहे याबाबत जयंत पाटील म्हणाले की, हाथरसमधील पीडीत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे. भाजपाने ज्यापध्दतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Read Also
राहुल गांधींना धक्काबुक्की ! पोलिसांनी कॉलर धरणं कितपत योग्य ? सुप्रिया सुळे यांचा योगी सरकारला सवालhttps://t.co/xkORsZLiDC#RahulGandhi #SupriyaSule #YogiAdityanath #Ncp #Congress @RahulGandhi @supriya_sule @myogiadityanath
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020