सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर राज्याचे गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे. मुंबई पोलिसांनी चांगल्या पद्धतीने तपास केला आहे , हि अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला. ही अभिमानाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कलम 174 अंतर्गत जो तपास केला, त्यात कोणताही दोष आढळला नाही. योग्य पद्धतीने तपास झाला, असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांबाबत ज्या पद्धतीने बोलत होते त्यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही. योग्य पद्धतीने तपास झाला.’
‘या प्रकरणाचा विरोधी पक्षाचे नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमध्ये पुढच्या काही काळात निवडणुका आहेत. या निवडणुका लक्षात घेऊन काही नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे,’ असे अनिल देशमुख म्हणाले.