मुंबई : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जहरी टिका केली. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून श्रीकांत शिंदे कारभार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी त्यासंदर्भात एक फोटो देखील ट्विट केलं होता. त्यात श्रीकांत शिंदे ज्याठिकाणी बसले होते. त्याच्या पाठीमागे मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावण्यात आला. त्यावर आता श्रीकांत शिंदे यांनी या सर्वांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
श्रीकांत शिंदे थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले..! रूपाली पाटील म्हणाल्या,” याला हावरेपणाची…”
मी वर्षा किंवा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो नाही. माझ्यामागे दिसणारा बोर्ड टेम्पररी होता. तो एका जागेवरून दुसरीकडे नेता येतो. एकनाथ शिंदे साहेबांची व्हीसी असल्यामुळे त्यांचं नियोजन करण्यात आलं होतं. फोटोत चुकीचा अॅंगल घेऊन कुणाला तरी मुद्दाम खोडसाळपणा करायचा होता आणि हा मुद्दा गाजवायचा होता असं शिंदेंनी म्हटलं आहे.
“एक वर्ष शेतात राब राब राबलो अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो..!” डॉ.तानाजीराव सावंत
त्याचबरोबर मी खासदार आहे, कुठे बसायचं आणि कुठे नाही हे मला कळतं. हे घरचं ऑफिस आहे. ठाण्याच्या लुईसवाडीतील खासगी निवासस्थानातील हे कार्यालय आहे. मंत्रालय किंवा वर्षा या शासकीय निवासस्थान नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. तसेच मुख्यमंत्री 18 ते 20 तास काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या गैरहजरीत कोणालाही कारभार सांभालायची गरज नाही. असं म्हणत त्यांनी विरोधकांची बोलती बंद केली.
शिवसेना शिंदे गट लागला कामाला…! सोलापुरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराण्याचा गल्ला? शेठ नसले तरी धाकले शेठ दुकान चालवतायत असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी मुख्यमंत्री झाल्याच्या शिंदेंना शुभेच्छा देऊन टाकल्या आहेत. त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
Read also
- “मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही”
- शिवतीर्थ मैदान कुणाला मिळणार? कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
- “मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराण्याचा गल्ला?” कायंदेंनी श्रीकांत शिंदेंना सुनावलं
- “गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्तधारी..!”
- “मशिदीवरील भोंगे, टोलनाके, आता राज ठाकरेंनी हाती घेतला नवीन मुद्दा” राज्य सरकारलाही दिला इशारा