औरंगाबाद – मी तिसऱ्यांदा आमदार झालोय, आता कुठे विकासकामाला गती आली आहे. आता केलेली काम दहा वर्षात का केली नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तो सहाजिकच आहे. पण पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात होतो, तर गेली पाच वर्ष युतीत गेली. आता कुठे सत्ता आणि नगरविकास खाते शिवसेनेकडे आले आहे. त्यात मी एकनाथ शिंदेचा लाडका असल्याने त्यांना पटवतोच, म्हणून मतदारसंघाला निधी मिळत आहे, अशा शब्दात पश्चिम मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी होत असलेल्या विकासकामांचे श्रेय एकनाथ शिंदेना दिले.
कोरोनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिला, याची जाण ठेवा – शिवसेना खासदार अरविंद सावंत
महापालिका आयुक्तांनी एक रुपया तरी दिला असता का? असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला. काहीकाळ समोरच्या व्यक्तीला राग येईल, तो बोलेल पण आपण खोटं बोललो असे तो म्हणू शकणार नाही. मला अनेकजण म्हणतात शिरसाट साहेब नेहमी मुंबईलाच असतात. पण मुंबईला गेल्याशिवाय कामे होत नाहीत. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी आणणे सोपी गोष्ट नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मी लाडका असल्यामुळे निधीसाठी त्यांना पटवतो आणि ते देखील देतात.
गेल्या दहा वर्षातच या भागात अनेक काम व्हायला हवी होती. तुमची माझ्याकडून ती अपेक्षा निश्चितच असणार, त्यात चुकीचे काही नाही. पण विरोधी पक्षात पाच वर्ष गेली, नंतर युतीत गेली, आता कुठे हे खाते आपल्याकडे आले आहे. एकनाथ शिंदे त्या खात्याचे मंत्री असल्यामुळेच निधी मिळू शकतो आहे. महापालिकेच्या भरवशावर एवढी काम झाली असती का? असा सवाल देखील शिरसाट यांनी उपस्थितांना केला.
वरचा मजला रिकामा असलेल्या कंगनाचा पद्मश्री पुरस्कार रद्द करा – नीलम गोऱ्हे
मतदारसंघातील नव्याने महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या सातारा देवळाई भागात संजय शिरसाट यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळे सुरू केल आहेत. नुकतेच त्यांनी माऊलीनगरसह परिसरातील ड्रेनेज लाईन व सिमेट रोडच्या कामांचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थितीत नागरिकांसमोर त्यांनी निधी आणण्यासाठी वारंवार मुंबईला कसे जावे लागते, भेटीगाठी घ्यावा लागतात याचे अनुभव कथन केले. संजय शिरसाट म्हणाले, या भागाचा विकास करण्याचा निर्धार मी केला आहे. इतर नेत्यांसारख फक्त घोषणा करायच्या आणि मग पुन्हा तिकडे फिरकायचेच नाही, हा माझा स्वभाव नाही. काम होणार असेल तर ते निश्चितच करणार, होणार नसेल तर ते देखील स्पष्ट सांगणे हा माझा स्वभाव आहे.
Read Also :
- यशोमती ठाकूर राजकीय पोळी भाजण्याचे काम करतायं, मुख्यमंत्र्यानी राजीनामा घ्यावा – रवी राणा
- “राज्यात दंगली भडकवण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात आघाडीचाच हात”
- वर्ध्यात भाजपला बसला मोठा धक्का; नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्षाने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना अटक
- एकत्र येण्याची इच्छा उरली नाही; भाजप- सेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान