मुंबई : काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, त्यांना निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केला होता अस म्हटलं होत, त्यानंतर अशोक चव्हाणांनी त्या वक्तव्यावरून यु टर्न घेतला पण आता महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुरांनी अशोक चव्हाणांची री ओढल्याने भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपात तथ्य”, अशोक चव्हाणांच्या आरोपांना यशोमती ठाकूर यांचा दुजोरा, तुझ्याशी माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. हे सरकार आहे की सर्कस हेच कळेनासं झालंय, अशी जळजळीत टीका त्यांनी केलीय.
"चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपात तथ्य", अशोक चव्हाणांच्या आरोपांना यशोमती ठाकूर यांचा दुजोरा…
तुझ्याशी माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना… हे सरकार आहे की सर्कस हेच कळेनासं झालंय… pic.twitter.com/i5iJ83WEBg— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 1, 2020
सध्या महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसत आहे, अनेक मंत्री आपल्या वेगवेगळ्या भूमिका मांडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेविरोधात काही मंत्री भूमिका घेतात तर काही पवारांच्या समर्थनार्थ भूमिका घेत असल्याची परिस्थिती सध्या आहे. आता अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात त्यावर बरच काही अवलंबून आहे.
दरम्यान महाराष्ट्रात राज्यपालनीयुक्त १२ जागांसाठी सध्या अनेक नावांची चर्चा सुरु आहे, त्यात दररोज नवनवीन नाव चर्चिले जात असताना आता महाविकास आघाडीच्या या अशा कारभारावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार कोडे ओढत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे, राज्यसभा उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला, आता म्हणे विधान परिषदेवरही दुसऱ्या पक्षातील पडेल उमेदवाराची आयात होणार…सत्तेचे अस्तित्वही दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर, आणि साहेबांना घरी बसल्या बसल्या दिल्लीची स्वप्न पडतात….असं ट्विट करत त्यांनी पवारांवर टीका केली आहे.
Read Also :
एकनाथ खडसे हे मोठे नेते त्यांची ताकद ही संपूर्ण महाराष्ट्रात : गृहमंत्री अनिल देशमुखhttps://t.co/q6WOtmzk2z @AnilDeshmukhNCP @EknathGKhadse
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020