मुंबई : हिवाळी अधिवेशनाने राज्यातला राजकीय पारा वाढवला असून, सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्त्यावरून उठलेली राळ शमायच्या अगोदरच आता गोपीचंद पडळकरांनी त्यावरही कडी करणारे वक्तव्य केले आहे. यामुळे अधिवेशनात खरे मुद्दे कमी आणि राजकीय गुद्देच जास्त पाहायला मिळाले, तर काही वावगे वाटू देऊ नका. आज पडळकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर ते अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका केलीय. यामुळे राजकीय ठिणग्या अजून बऱ्याच पडण्याची चिन्हे आहेत.
तीन दिवसांच्या विधीमंडळ अधिवेशनासाठी आमदार महेश लांडगेंचे तीन महत्त्वाचे मुद्दे..!
गोपीचंद पडळकर आणि पवार यांचे सख्य उभ्या महाराष्ट्राला माहितय. आता अधिवेशन सुरू असताना पवारांवर टीका करण्याची संधी सोडणारे पडळकर कसले. त्यांनी अजित दादांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील. शिवाय सध्या सुरू असलेल्या परीक्षा घोटाळ्यांवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
विधानसभेत राडा! भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल, फडणवीसांकडून निलंबनाची मागणी!
पडळकर म्हणाले, राज्यात विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत. हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय. हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय, असा आरोपही त्यांनी केला. या घोटाळ्यात तुमचेच एवढी लोक यात सामील असतील, तर पोलीस चौकशी कशी करणार, असा सवाल करत सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआय चौकशी केली, तर बिघडलं कुठं, तुम्ही काही केलं नाही, तर भीती कसली, करू द्या ना सीबीआय चौकशी, अशी मागणीही त्यांनी केली.
Read also:
- एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था शेतकऱ्यांसारखी झालीय, कामगार आत्महत्येच्या मनस्थितीत – गुणरत्न सदावर्ते
- विधानसभेत उडाल्या `क्राॅस कनेक्शन`च्या ठिणग्या; नितीन राऊतांना टार्गेट करताना पटोलेंनी दिली फडणवीसांना साथ
- परीक्षा घोटाळ्यावरून फडणवीस-पटोलेंमध्ये वाद; फडणवीस म्हणाले यंत्रणा सडलेली, पटोले म्हणाले कराचं चौकशी..
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींचा फोन..
- अखेर भास्कर जाधवांना देवेंद्र फडणवीसांनी झुकवलं; भर सभागृहात जाधवांनी मागितली माफी