मुंबई – विधानसभेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नेहमीच खटके उडत असतात. मात्र आज ऊर्जा खात्यावरील चर्चेत दोघे एकत्र आले आणि त्यांनी त्या खात्याचे मंत्री नितीन राऊत यांना कोंडित पकडले.
आपल्याच पक्षातील मंत्र्याला शक्यतो जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. पण पटोले यांनी एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदाराप्रमाणे राऊत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. विशेष म्हणजे नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांना ‘ऊर्जा’ खात्यात विशेष रस होता. त्यामुळे आज सभागृहात संधी मिळताच नाना पटोले यांनी उर्जामंत्र्यांना अडचणीत आणल्याचे चित्र होते.
सत्ताधाऱ्याच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार..!
राज्यात वीज कनेक्शन तोडले जात असल्याबद्दल ऊर्जा खात्यावर लक्षवेधी होती. फडणवीस यांच्यासह इतर सत्ताधारी सदस्यांनीही राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. डीपी मिळत नाही, रस्त्यावरील दिवे सुरू नाहीत, भरमसाठ वीजबिले अशा अनेक तक्रारी या वेळी करण्यात आल्या. पथदिवे बंद असल्याने हजारो गावे अंधारात असल्याचा मुद्दा फडणवीस यांनी लावून धरला. ग्रामविकास आणि नगरविकास खात्याने ही थकबाकी भरावी आणि ती भरेपर्यंत वीज कनेक्शन कट करू नये, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
नाना पटोले यांनीही फडणवीस यांच्या मागणीला पाठिंबा दिला. ग्रामीण भागात कृषी पंपाला किमान बारा वीज मिळावी. 2017 ते 2019 असा दुष्काळ असतानाही तेव्हाची वीजबिले आता दिली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांता मोठा रोष असल्याचा मुद्दा पटोले यांनी लावून धरला. विविध प्रश्न विचारून पटोले यांनी राऊतांना अडचणीत आणले. आणि विधानसभेत `क्राॅस कनेक्शन`च्या ठिणग्याचं उडाल्या.
Read also:
- परीक्षा घोटाळ्यावरून फडणवीस-पटोलेंमध्ये वाद; फडणवीस म्हणाले यंत्रणा सडलेली, पटोले म्हणाले कराचं चौकशी..
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींचा फोन..
- अखेर भास्कर जाधवांना देवेंद्र फडणवीसांनी झुकवलं; भर सभागृहात जाधवांनी मागितली माफी
- विधानसभेत राडा! भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल, फडणवीसांकडून निलंबनाची मागणी!
- तीन दिवसांच्या विधीमंडळ अधिवेशनासाठी आमदार महेश लांडगेंचे तीन महत्त्वाचे मुद्दे..!