मुंबई – एकीकडे महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे दिल्लीतही विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभेत आज पुन्हा एकदा आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. ही मागणी खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली होती. आणि समोर होते सत्ताधारी पक्षाचे आमदार भास्कर जाधव. राज्यातील विजेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर गदारोळ झाला आणि विरोधकांनी भास्कर जाधवांच्या निलंबनाची मागणी केली.
‘वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल’, फडणवीसांची चौफेर टीका
नेमकं झालं काय?
विधानसभेत राज्यातील वीज कनेक्शन कापणीसंदर्भातील धोरणावर चर्चा सुरू असताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका विधानाचा संदर्भ दिला. “पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ५० लाख जमा करणार असं म्हटलं होतं, ते केले नाहीत”, असं राऊत म्हणाले. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेत राऊतांना आव्हानच दिलं.
“मी आव्हान देतो की नितीन राऊतांनी पंतप्रधानांनी असं म्हटल्याचं वाक्य आणून दाखवावं नाहीतर देशाची माफी मागावी. या सभागृहात नसणाऱ्यांविषयी बोलायचं नसतं कारण ते उत्तर देण्यासाठी इथे नसतात असा नियम आहे. वाट्टेल ते बोलायचं हे चालू देणार नाही. आम्ही तुमच्या नेत्याबद्दल बोलू का? हे कामकाजातून काढा”, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावर बोलताना नितीन राऊतांनी २०१४ च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा केल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं. यावर देखील आक्षेप घेत देवेंद्र फडणवीसांनी मोदी असं म्हटलेच नसल्याचा दावा केला.
हिवाळी अधिवेशनासाठी भाजपने कंबर कसली; फडणवीस म्हणातात या सरकारनं लोकशाही संपवली
यानंतर भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत मोदींची नक्कल केली. “२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी १०० वेळा म्हणाले आहेत की ‘काला धन लाने का के नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहाँ रखने का? यू ही रखने का’ असं ते बोलले आहेत”, असं भास्कर जाधव नक्कल करत म्हणाले.
यावर देवेंद्र फडणवीसांनी लागलीच भास्कर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली. “पंतप्रधानांची नक्कल या सभागृहात चालणार आहे का? पंतप्रधानांची नक्कल करणं चुकीचं आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे लाज”, असं फडणवीस म्हणाले. तसेच, “त्यांनी सभागृहाची माफी मागावी”, असं देखील फडणवीस म्हणाले.
Read also:
- तीन दिवसांच्या विधीमंडळ अधिवेशनासाठी आमदार महेश लांडगेंचे तीन महत्त्वाचे मुद्दे..!
- हिवाळी अधिवेशन 2021: भाजपकडून अध्यक्षांना अर्ज; 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी विनंती
- काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर; नाना आणि भाईंमधील अबोल्याच्या सर्वांना आला अंदाज..
- आता सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचचं नाव बदलणार का? निलेश राणेंचा संतप्त सवाल
- “मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नाही”; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी