मुंबई – काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी लपून राहात नसल्याचे विधीमंडळाच्या आवारात बुधवारी उघडपणे दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप समोरासमोर येऊनही नमस्कार सोडा; पण एकमेकांडे पाहिले नाही. भाईंना पाहून नानांनी मान वाकडी केली; तर भाईंनीही इकडे-तिकडे न पाहाता निघून गेले. त्यावरून प्रदेश काँग्रेस-मुंबई काँग्रेस म्हणजे, नाना-भाईमधील अबोल्याच्या आणि मतभेदाच्या दरीचा सर्वांना अंदाज आला.
आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
विधीमंडळाच्या आवारात आज सकाळी सव्वाअकरा वाजता आलेले नाना हे दारातच माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. त्याचवेळी म्हणजे, ११ वाजून २५ मिनिटांनी भाईही आवारात आले. तेव्हा विधान भवनाच्या पायऱ्याच्या अलीकडे नानांची मुलाखत सुरू होती. शेजारी अंथरलेल्या ‘रेड कार्पोरेट’ वरून भाई आले. भाई येत असल्याचे पटोलेंच्या नजरेत आले आणि पटोले कॅमेऱ्याकडे पाहून बोलू लागले. नानांना पाहिलेल्या भाईंनी न पाहता पायऱ्यांवर आले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून नाना आणि भाई यांच्यात मतभेद असल्याचे दिसून आले. त्यातून एकमेकांच्या निर्णय न पटण्याची भूमिकाही या दोघा नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे दोघे फारसे एकत्र येताना दिसत नाही. त्यात भर म्हणजे, येत्या २८ डिसेंबरला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभेच्या परवानगीवरून तर प्रदेश कांग्रेस आणि मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद नव्हे तर वादच असल्याचे दिसून आले.
पटोले दिल्लीला रवाना, विधानसभा अध्यक्षपदाबाबत हायकमांडशी चर्चा
देश पातळीवरच्या नेत्यांना विश्वास न घेताच भाईनी सभेसाठी राज्य सरकार आणि त्यानंतर न्यायालयात धाव घेतल्याचा आरोप काँग्रेसच्याच नेत्यांचा होता. त्यावरून दोन्ही संघटनांमधील नेत्यांचे दिल्ली दरबारातून कानही टोचले गेल्याची सूत्रांकडून सांगण्यात आले होते. या घटनेपासून तर नाना-भाईमध्ये वाद वाढत गेल्याचे बोलले जात आहे. या वादाचा परिणाम म्हणजे, मुंबईतील राहुल यांची सभाच रद्द करावी लागली. त्यामुळे दिल्लीची नाराजी ओढवून घेतलेल्या मुंबई काँग्रेसने अर्थात, भाई जगताप यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्याचे दिसत आहे.
Read also:
- आता सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचचं नाव बदलणार का? निलेश राणेंचा संतप्त सवाल
- “मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नाही”; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी
- ‘शहा मस्त तर त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त’; शहांच्या दौऱ्यावरून शिवसेनेने केले भाजपला टार्गेट
- हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची पहिलीच मागणी अजित पवारांनी केली मान्य..
- विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन; ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी