मुंबई – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज बुधवारी सुरू झाली. या अधिवेशनात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला अनेक मुद्यांवर घेरले जाणार असल्याचे संकेत आधीच दिले आहेत. तर सरकारनेही विरोधकांचा हल्ला परतवून लावण्याची जय्यत तयारी केली आहे. अधिवेशन सुरू झाले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात अनुपस्थित आहेत.
विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यांनी सुरूवातीला नवनिर्वाचित सदस्य जितेश अंतापूरकर यांचा परिचयाने कामकाजाची सुरूवात केली. पण लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडत कामकाज पत्रिकेवरून सरकारला प्रश्न केला. पहिल्याच दिवशी कामकाज पत्रिकेवर 12 बिले विचारार्थ मांडण्यात आल्याबाबत त्यांनी टीका केली.
पाठीत खंजीर खुपसला तर तो उलटा फिरवायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा
फडणवीस म्हणाले, पहिल्या दिवशी केवळ शोक प्रस्ताव देतो, पण गेले अनेक अधिवेशन कामकाज होत नाही, लक्षवेधी, प्रश्नोत्तरे होत नाही. त्यामुळे मी आग्रह केला होता की, पहिल्या दिवशीही प्रश्नतोत्तर आणि लक्षवेधी घेतल्या पाहिजेत. सरकारनेही हे मान्य केले होते. पण आज कामकाजपत्रिकेवर 12 बिले विचारार्थ मांडण्यात आली आहेत. आजच बिले मांडायची आणि आजच विचारार्थ ठेवायची, ही नवीन पध्दत सुरू झालीय.
सदस्यांनी बिले वाचायचीच नाहीत का, ही कुठली पध्दत आहे. एक दिवसाचे अधिवेशन होते, त्यावेळी हे मान्य होते. पण पाच दिवसाचे अधिवेशन असताना हे असं का? ही योग्य पध्दत नाही. त्याचा खुलासा करायला हवा. बिले महत्वाची आहेत, आम्हाला वाचायची आहेत, असं स्पष्ट करत फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी घेण्याची विनंती केली.
राज्याच हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; उद्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने भिडणार
फडणवीसांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सरकारची हीच भूमिका आहे. कामकाजपत्रिकेनुसार सर्व कामकाज होईल. शासकीय विधेयके ब पर्यंतच घ्यावीत, त्यानंतर शोक प्रस्ताव घ्यावा, हे सरकारला मान्य आहे. त्यानुसार परवानगी देण्याची विनंती पवार यांनी अध्यक्षांकडे केली.
Read also:
- विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन; ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी; ७० हजार कर्मचारी अजूनही संपावर ठाम
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ सहकाऱ्याची ईडीकडून तब्ब्ल ८ तास चौकशी
- सतेज पाटील, हसन मुश्रिफांपाठोपाठ आता आमदार राजेश पाटीलही जिल्हा बँकेत बिनविरोध
- उपमुख्यमंत्र्यांनी दिले मेट्रो कामाचे आदेश; तरीही पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दुट्टपी राजकारण का?