मुंबई : राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून भ्र्रष्टाचाराच्या आरोपाखाली महाविकास आघाडीतील मंत्र्यांची चौकशी सुरु आहे. परिवहनमंत्री. ऍड. अनिल परब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमांत्री प्राजक्त तनपुरे आणि इतरही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत तर काही नेत्यांची ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे.
नगरपंचायत निवडणुकीला हिंसाचाराचं गालबोट; महाविकास आघाडी आणि भाजपा समर्थकांमध्ये तुफान हाणामारी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्र्याची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेनेचे माजी मंत्री, विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांची तब्ब्ल आठ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल आठ तासांसाठी रवींद्र वायकर हे ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले आहेत.
शिरुर मतदारसंघाची अवस्था म्हणजे… “धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का”
आमदार रवींद्र वायकर यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. आमदार रवींद्र वायकर हे हे माजी मंत्री आहेत आणि मुंबई महानगरपालिकेत ते १५ वर्ष स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिलेले आहेत. जोगेश्वरी येथील मातोश्री क्लब, शिवछत्रपती संस्थानासह अनेक समाजिक संस्था आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये संचालक म्हणून काम पाहत आहेत. रविंद्र वायकर हे आज दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांना ईडीकडून अचानक बोलावणे आल्याने आता पुन्हा एकदा राजकीय खळबळ माजते की काय ? असा सवालही अनेकांना पडला आहे.
Read also:
- सतेज पाटील, हसन मुश्रिफांपाठोपाठ आता आमदार राजेश पाटीलही जिल्हा बँकेत बिनविरोध
- उपमुख्यमंत्र्यांनी दिले मेट्रो कामाचे आदेश; तरीही पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दुट्टपी राजकारण का?
- सत्ताधाऱ्याच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार..!
- “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जानकरांनी वाद निर्माण करू नये”
- नगरपंचायतीत मोठंमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला मिळणार?