शिरूर : बैलगाडा शर्यतीची लढाई माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात लढण्यात आली. बैलगाडा शर्यतीचा लढ्याला अखेर यश मिळाळ्याने शिरुर मतदार संघासह महाराष्ट्रातील जनता खुश झाली. परंतू, माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील आणि आजी खासदार अमोल कोल्हे केवळ श्रेयवादाच्या लढाईत गुरफटले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे, शिरुर लोकसभा मतदार संघाची अवस्था “धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का”, अशी झाल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
२०१९ च्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीकडून लोकसभेचे तिकिट पक्के झाले. छत्रपतींची भुमिका करणारा कलावंत, त्यातच निवडणून दिल्यास बैलगाडा शर्यत चालू करू या दोन गोष्टींच्या लोकप्रियतेवर कोल्हेंना शिरूरमधील जनतेने कौल दिला. परंतू, आज शिरुरची परिस्थिती काय आहे?, विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना भिंगातून पाहण्याची वेळ शिरुरच्या जनतेवर आली आहे. भाजपने १० वर्षे अखंड लक्ष देवून बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले. आयत्या बिळावर नागोबा असा अविर्भात कोल्हेंनी ते श्रेय घेतलं. तर दुसरीकडे माजी खासदार तथा शिवसेना नेते आढाळराव पाटील हे १० वर्षे मीच लढा दिल्याचे जनतेला ठासून सांगण्याचे काम करत आहेत.
आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
छत्रपतींची भुमिका करणारा कलांवंत म्हणून आपली शिरुरमधून निवड केली. परंतू, आज खासदार उपलब्ध नाहीत. कधीतरी ढगातून सुर्य बाहेर यावा चार किरण अंगावर पडावीत अशी अवस्था शिरूर मतदारसंघाची झालेली आहे. दरम्यान, त्याउलट शिवाजीराव हे उपलब्ध या शब्दाला न्याय देत होते. असं म्हटलं जायचं. त्यामुळे, शिरुरचा शेतकरी आतुरतेने शिवाजीराव आढाळराव पाटलांकडे बघायचां. परंतू. आज काय परिस्थिती आहे. शिवसेना, राष्ट्रवादी ही महाआघाडीची दोन अपत्ये असल्याने आढाळराव पाटीलांनी तोंडाला पट्टी गुंडाळने भाग आहे. परंतू, शिवनेरीच्या पायथ्याजवल राहणारा हा खरा शिवाजी नाटकी शिवाजी -संभाजीच्या एक पाऊल नक्कीच पुढे असल्याचे बोलले जाते.
पटोले दिल्लीला रवाना, विधानसभा अध्यक्षपदाबाबत हायकमांडशी चर्चा
बैलगाडा शर्यत सुरू झाली म्हणजे मतदार संघाचे प्रश्न संपले का? खेड चाकणची वाहतूककोंडी जेंव्हा संपेल तेव्हा कामाची खरी चूणूक दिसेलं. पुणे-नाशिक रेल्वे मार्ग सुरू होईल तेव्हा खासदारकीचं प्रतिबिंब दिसू लागेल. चार-दोन नवी धरणे बांधली जातील तेव्हाच अमोल चे अनमोल व्हाल. आज काय चित्र आहे? ज्या पक्षाचा नेता धरणात मुतण्याची भाषा करतो, त्या पक्षाचा खासदार काय दिवे लावणार हे स्पष्ट झालं. संसदरत्न म्हणून मिरवताना तेवढी वर्षे घासावी लागता. पहिल्यांदा नगरसेवक होताच चार महिन्यात कार्यसम्राच नगरसेवक पदवी लागावी तशी अवस्था या संसदरत्नाची झाली. त्यामुळे, शिरुर मतदार संघाच पोरकेपण जनतेला पाहावेनास झालं आहे.
Read also:
- नगरपंचायत निवडणुकीला हिंसाचाराचं गालबोट; महाविकास आघाडी आणि भाजपा समर्थकांमध्ये तुफान हाणामारी
- ‘वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल’, फडणवीसांची चौफेर टीका
- हिवाळी अधिवेशनासाठी भाजपने कंबर कसली; फडणवीस म्हणातात या सरकारनं लोकशाही संपवली
- राजकारणात कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो; युतीबाबत गडकरींचे मोठे विधान
- “गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केले. ही नौटंकी चालणार नाही”