मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकशाहीच कुलूपबंद केली आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्याच्या अधिवेशनात भाजपच्या आमदारांचं संख्याबळ कमी व्हावं, यासाठीच त्यांना वर्षभर सस्पेंड केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
आमचे ३०-३५ आमदार होऊ द्या, मराठ्यांना आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो; महादेव जानकरांची ग्वाही
बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं पत्रकार परिषद घेतली यावेळी फडणवीस बोलत होते.
अजित पवार यांचा निकटवर्तीय असलेला ‘हा’ नेता काँग्रेसच्या वाटेवर
यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत.
शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना: चंपा असो की डंफा सगळे मूग गिळून गप्प बसलेतं – अरविंद सावंत
भाजपच्या 12 आमदारांना वर्षभर निलंबन कायम ठेवण्याच्या निर्णयाविरोधात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ संसदेचं अधिवेशन इतका काळ अधिवेशन चालू शकतं तर महाराष्ट्राचं का चालत नाही? राज्यात सर्वात कमी वेळ अधिवेशन घेतलं जात आहे. लोकशाही जेवढी कुलुप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. माहराष्ट्रात मानसिकताच नाही.
सदावर्ते हे आमचे वकील आहेत, भूमिका पटली नाही तर वकील बदलून टाकू – अजय गुजर
खर तर या सरकारने लोकशाही थांबवली आहे, या सरकारमध्ये रोकशाही सुरु आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार महाराष्ट्राने या आधी कधीही पाहिलेला नाही. स्थगिती, खंडणी, वसूली, भ्रष्टाचार, याचे जेवढे प्रकार या सरकारच्या काळात पाहिला मिळतायत, ते महाराष्ट्रात या आधी कधीही पाहिला मिळालं नाही असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
Read also:
- राजकारणात कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो; युतीबाबत गडकरींचे मोठे विधान
- “गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केले. ही नौटंकी चालणार नाही”
- पटोले दिल्लीला रवाना, विधानसभा अध्यक्षपदाबाबत हायकमांडशी चर्चा
- आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
- “संजय राऊतांनी शिवसेनेतील बाकीच्यांना जवळजवळ नामशेष केले”; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका