नागपूर – हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली दौरा करत आहेत. नवी दिल्लीत हायकमांडसोबत नवीन विधानसभा अध्यक्ष आणि फेरबदल्यांवर चर्चा होणार असल्याचं कळतं. नाना पटोले हे दिल्लीला आज रवाना होणार आहेत. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले दिल्लीला रवाना होणार आहेत.
शिवसेनेशिवाय भाजपानं १०५ आमदार पुन्हा निवडून आणून दाखवावं; राउतांचे अमित शहांना प्रतिआव्हान
विधानसभा अध्यक्षांबाबत हायकमांड जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, असं नाना पटोले यांनी सांगितलं. काँग्रेसचे नेते वेणूगोपाल आणि एच. के. पाटील यांच्यासोबत आज संध्याकाळी भेट घेणार आहेत. त्यानंतर शक्य झालं तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट होणार असल्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.
अमित शहांची मुख्यमंत्र्यांवर टीका, पण प्रकृती स्वास्थ्यासाठीही केली प्रार्थना…
हायकमांडनं मला बोलावलं आहे. यासंदर्भातील चर्चा त्याठिकाणी होणार आहे. पेपर फुटीचं प्रकरण, ओबीसी आरक्षण या विषयांवर हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. परीक्षा घेणाऱ्या एजन्सी आरएसएस आणि जुन्या लोकांच्या होत्या. त्या लोकांनी मुद्दामहून हा सारा प्रकार केला. याचा राज्यातील तरुणांना त्रास झाला. त्यामुळं या प्रकरणात जो काही दोषी असेल, त्याच्यावर कारवाई व्हावी, ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं
Read also:
- आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
- “संजय राऊतांनी शिवसेनेतील बाकीच्यांना जवळजवळ नामशेष केले”; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
- सदावर्ते हे आमचे वकील आहेत, भूमिका पटली नाही तर वकील बदलून टाकू – अजय गुजर
- महादेव जानकारांचा नवा शोध; म्हणाले, शिवाजी महाराजही ओबीसी होते
- मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध