कोल्हापूर – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेला कोंडीत पकडले. यावेली त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानावरून शिवसेनेला लक्ष्य केले.
‘दोन पिढ्या ज्यांच्याविरोधात लढले, त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले’; अमित शाह शिवसेनेवर बरसले
रामदास कदमयांच्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे. कदम यांनी केलेल्या आरोपानंतर नेमकी शिवसेना कोण चालवत आहे? असा प्रश्न लोकांमध्ये उपस्थित झाला आहे, अशी माहिती माध्यम प्रतिनिधीने दिल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, ही तर सुरूवात आहे. कारण मागील दोन वर्षांमध्ये संजय राऊतच सामनाचे संपादक, संजय राऊतच शिवसेनेचे प्रवक्ते, संजय राऊतच सरकारचे प्रवक्ते, संजय राऊतच पक्षाचे प्रवक्ते म्हणजे सरकारसंबधी काही असेल तरी तेच बोलणार, केंद्रात सरकार विषयक काही बोलायचे तरी तेच बोलणार, असे सध्या सुरू आहे. बाकीच्यांना जवळजवळ नामशेष केले आहे. पुन्हा एकदा, हा माझा विषय नाही. उद्या सामनात अग्रलेख येणार आहे, माझ्यावर आलेल्या अग्रलेखांचं एक पुस्तक छापण्याचा माझा विचार सुरू आहे. त्यामुळे उद्या अग्रलेख येणार आहे की आमचं तुम्हाला काय पडलंय आहे?
टीईटी पेपरफुटी प्रकरण: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी 2 कोटी रुपये कॅश आणि सोनं सापडलं
तसेच ते पुढे म्हणाले की, पण मग रामदास कदमांनी आता विरोधात बोलण्याचा निर्णय घेतला आहे. पण मागील दोन वर्ष ते कुठे होते? त्यांना काहीही स्थान नव्हतं. दिवाकर रावते कुठे आहेत? अनिल देसाई कुठे आहेत? सुभाष देसाई, एकनाथ शिंदे कुठे आहेत? केवळ संजय राऊतच. तर, “माध्यमांसाठी फक्त संजय राऊत आणि शिवसेनेच्या कारभारासाठी अनिल परब यातली घुसमट ही बाहेरच पडेल. यावर संजय राऊत उद्या अग्रलेखात प्रश्न विचारतील की तुम्हाला आमच्या घरातलं काय पडलंय? आता तुम्ही (माध्यमांनी) प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं.
Read also:
- सदावर्ते हे आमचे वकील आहेत, भूमिका पटली नाही तर वकील बदलून टाकू – अजय गुजर
- महादेव जानकारांचा नवा शोध; म्हणाले, शिवाजी महाराजही ओबीसी होते
- मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध
- राज्याच हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; उद्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने भिडणार
- पाठीत खंजीर खुपसला तर तो उलटा फिरवायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा