नवी दिल्ली – मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास आमचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे.
निवडणूक प्रक्रियेत मतदानकार्डाला आधारकार्ड लिंक करायला नको. यामागे केंद्र सरकारचा कुठला तरी कुटील डाव असू शकतो, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच काल राज्यसभेत जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा संताप, उद्रेक स्वाभाविक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
“बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य आले”; मनिषा कायंदेंकडून गुलाबराव पाटलांची पाठराखण
भाजपेत्तर राज्यात केंद्राकडून त्रास दिला जातोय असंही त्यांनी सांगितलं. तसेच सिंधुदुर्गात चारही नगरपरिषदेत युती यशस्वी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील गटबाजीत उद्धव ठाकरे लक्ष घालतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही आगामी नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडवणार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भीष्मप्रतिज्ञा
दरम्यान, काल मतदान कार्डाला आधार कार्ड जोडण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. आधारकार्ड मतदान कार्डाला जोडणं अनिवार्य बनवण्यात आलं आहे. हा स्वैच्छिक निर्णय असेल असं सांगत केंद्रीय विधी मंत्री किरेन रिजीजू यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. स्थायी समितीच्या शिफारशीनंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Read also:
- राज्याच हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; उद्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने भिडणार
- पाठीत खंजीर खुपसला तर तो उलटा फिरवायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा
- पेपरफुटी प्रकरणात भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला अटक
- शिवसेनचं ठरलंय ; ‘या’ दिवशी सामील होणार युपीएत
- ५४ दिवसांपासून चालेलला संप अखेर मागे; लाल परी पुन्हा एकदा धावणार रस्त्यावर