पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वितुष्ठ सर्वांनाच न्यात आहे. नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र हे शिवसेनेच्या नेतृत्वावर नेहमीच जहरी टीका करत असतात. आता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचे काम केले आहे.
उद्धवा अजब तुझे सरकार; स्वतःच्या पक्षालाच दिलाय निधी वाटपात सर्वात कमी निधी
वेंगुर्ला जिल्ह्यातील चारही नगरपरिषद सध्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे आमच्या ताब्यात आहेत. त्यायापुढेही आमच्या ताब्यात राहणार आहेत. या नागरपरिषदांच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेचा धुव्वा उडवणार आहे. आम्हाला बढाया मारण्याची गरज नाही मात्र आम्ही चारही नगरपरिषदा जिंकू असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केला आहे.
महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबीच्या जाळ्यात..!
वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर नारायणर राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील चारही नागरपरिषदांमध्ये त्यांनी यावं आणि नगरपरिषदा घेऊन जाव्या असं व्हायला आम्ही काही डोळे मिटून आहोत का ? शिवसेनेची ताकद तरी आहे काय ? असा खोचक सवालही राणेंनी उपस्थित केला आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाषणही केलं. आमचे मित्र माजी मंत्री दीपक केसरकर हे ऑनलाईन मला दिसले. आता ते पूर्वीसारखे चांगल्या कामात दिसत नाहीत असा टोला देखील राणेंनी केसरकारांना मारला आहे. देश आत्मनिर्भर होण्यासाठी नरेंद्र मोदी काम करत आहेत. त्यांनी मला देखील यासाठी काम करावं असं सांगितलं आहे. मी देखील त्यांना हो बोललो आहे. देशातील जनतेसाठी मोदी १८-१८ तास कर्म करतात. दुसरा कोणता नेता एवढं काम करू शकतो का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Read also:
- “बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य आले”; मनिषा कायंदेंकडून गुलाबराव पाटलांची पाठराखण
- “जर माझ्या मतदारसंघाततील हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”
- हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- …तेव्हा फडणवीसचं मुख्यमंत्री होतील असं ठरलं होतं, शिवसेनेनेच सत्तेसाठी वचन मोडले – अमित शहा
- उद्धव ठाकरेत हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा, अन्…; अमित शहांच मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान