पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारणाला ऊत आला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्षात टोकाचा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंकडेचे नेते एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत.
जो प्रयत्न अमरावतीत झाला तो पुन्हा झाला तर सोडायचं नाही; राज ठाकरेंचे आदेश
तत्कालीन मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. याच सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पाप झाले आहे. फडणवीस म्हणाले की कोरोना महामारीच्या काळात ह्या सरकारने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केली नाही. कसल्याही सुविधा दिल्या नाही.
शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल
मात्र लॉकडाउन शिथिल होताच सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा या सरकारने कोणताही मागचा-पुढचा विचार न करता दारू विक्रेत्यांना मदत मिळावी म्हणून परवाना शुल्क कमी केले. हे सरकार फक्त एवढ्यावरच नाही थांबले तर दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारू वरील ५०% कर कमी करण्याचा निर्णय घेतला.
रामदास कदमांच्या गंभीर आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
त्यामुळे हे गोरगरीब लोकांचे सरकार नसून दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. नाना पटोलेंवर देखील त्यांनी टीका केली आहे. रोज संविधान खतरे मे हे असं म्हणता मात्र धान्य उत्पादक शेतकऱ्यांबद्दल काहीच बोलत नाही. हे सरकार रोज शेतकऱ्यांची वीज कापत आहेत आणि आम्ही एकदाही शेतकऱ्यांची वीज गेल्या पाच वर्षात कापली नसल्याचा दाखला यावेळी फडणवीसांनी दिला आहे.
Read also:
- …तेव्हा फडणवीसचं मुख्यमंत्री होतील असं ठरलं होतं, शिवसेनेनेच सत्तेसाठी वचन मोडले – अमित शहा
- उद्धव ठाकरेत हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा, अन्…; अमित शहांच मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
- ‘‘गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’’ गुलाबराव पाटलांना चित्रा वाघ यांचा इशारा
- महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
- छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होणं, ही छोटी गोष्ट; मुख्यमंत्र्याचा संतापजनक वक्तव्य