पुणे : उद्धव ठाकरे म्हणतात की मी खोटं बोलतोय, चला आपण एक सेकंदासाठी मानू. पण उद्धवभाऊ तुमच्या सभेच्या मागे जे बॅनर होते ते तुम्ही कधी पाहिले का? मोदींचा फोटो केवढा होता आणि तुमचा केवढा होता पाहिला का? तुम्हाला तुमच्या प्रत्येक भाषणात मोदींचं नाव घ्यावं लागत होतं. तुम्हाला मी आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. मात्र त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून विश्वासघात केला. सत्तेवर बसून काय केलं?, अशा शब्दात केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी पु्ण्यातून शिवसेनेला टोले लगावले आहेत.
महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
पुण्यात भाजपच्या बूथ संपर्क अभियानाचा प्रारंभ शहा यांच्या उपस्थितीत या वेळी करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, पक्षाचे सर्व आमदार या वेळी उपस्थित होते. शहा म्हणाले की मी निवडणुकीनंतर खोटे बोललो. वचन मोडले, असा आरोप ते करत होते. एक मिनिटासाठी ते खरे (उद्धव ठाकरे) बोलतात, असे मानू. पण त्या निवडणुकीत तुमच्या बॅनरवर मोदींचा फोटो किती मोठा होता, हे तरी आठवून पाहा. मोदींचा फोटो तुमच्या फोटोपेक्षा चौपट मोठा होता, याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली.
जो प्रयत्न अमरावतीत झाला तो पुन्हा झाला तर सोडायचं नाही; राज ठाकरेंचे आदेश
मी आणि मोदी यांनी एकत्रित तुमच्यासोबत (ठाकरे) सभा घेतल्या. त्या सभांतही फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे आम्ही सांगितले होते. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून तुम्ही विश्वासघात केला. सत्तेवर आलात. पण सध्या येथे काय सुरू आहे? महाराष्ट्रातील आघाडी सरकार तीन चाकांची अॅटो रिक्षा असून या रिक्षाची तीनही चाके वेगवेगळ्या दिशांना जात असल्याची टीका या आधी मी केली होती. पण त्यात आता मला दुरूस्ती करावी वाटते. या रिक्षाची तीनही चाके पंक्चर असून ती रिक्षा चालत नाही, अशी टीका अमित शहांनी या वेळी केली. ही रिक्षा फक्त धूर सोडत असून प्रदूषण करत असल्याचा टोमणा मारला.
शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील सरकार हे राज्याल अधोगतीकडे नेत असल्याचे सांगत या राज्याचे जुने वैभव हे सरकार पुन्हा मिळवून देऊ शकत नाही. हे सरकार बिनकामाचे आहे. हे सरकार घालविण्याचे काम पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालापासून सुरू झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. मोदीजींच्या नेतृत्वाची मोहीनी मतदारांवर आहे. तुम्ही केलेली काम त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
Read also:
- उद्धव ठाकरेत हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा, अन्…; अमित शहांच मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
- ‘‘गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’’ गुलाबराव पाटलांना चित्रा वाघ यांचा इशारा
- महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
- छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होणं, ही छोटी गोष्ट; मुख्यमंत्र्याचा संतापजनक वक्तव्य
- रामदास कदमांच्या गंभीर आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…