मुंबई – राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक नेते प्रचारसभा आणि जोरदार भाषणांची फटकेबाजी देखील सुरु आहे. त्यातच महाराष्ट्राचे मंत्री आणि वरिष्ठ शिवसेना नेता गुलाबराव पाटील यांनी एक अजबच वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन सडकुन टीकेबाजी होत आहे.
उद्धवा अजब तुझे सरकार; स्वतःच्या पक्षालाच दिलाय निधी वाटपात सर्वात कमी निधी
‘माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राला शिकवता?’, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहेत. त्यावरुन अनेक नेत्यांनी गुलाबरावांनी माफी मागावी यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंत्री पाटील यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, राज्य महिला आयोगाने कठोर भूमिका घेतल्यानंतर मंत्र्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली.
महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबीच्या जाळ्यात..!
मात्र या वक्तव्यावरुन शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी गुलाबराव पाटलांची पाठराखण केली आहे. गुलाबराव पाटलांच्या तोंडून बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य आले असेल. त्यांच्या वाक्याचा शब्दश: अर्थ घेऊ नये. त्यांना त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करायचे असेल. बोलण्याच्या ओघात बोलले असतील, असे मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.
Read also:
- “जर माझ्या मतदारसंघाततील हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”
- हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- …तेव्हा फडणवीसचं मुख्यमंत्री होतील असं ठरलं होतं, शिवसेनेनेच सत्तेसाठी वचन मोडले – अमित शहा
- उद्धव ठाकरेत हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा, अन्…; अमित शहांच मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
- ‘‘गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’’ गुलाबराव पाटलांना चित्रा वाघ यांचा इशारा