मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु होता. विलगीकरण, पगारवाढीच्या मुद्द्यावर चाललेला संप हा चांगलाच पेटला होता. संपाचे नेतृत्व हे ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
“जर माझ्या मतदारसंघाततील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”
मात्र काल एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि सरकारी पक्षात झालेल्या बैठकीमध्ये संपावर तोडगा काढण्याचा निर्णय अखेर झाला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, आणि अजय गुजर यांच्यात काल तब्बल ५ तास बैठक झाली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेवून संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. याच संघटनेच्या नोटीसीनंतर हा संप सुरु झाला होता.
“भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात”; महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौप्यस्फोट
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री परब म्हणाले की आमच्यात मॅरेथॉन बैठक पार पडली आहे. विलगीकरणाच्या मुद्यावर शासनाने त्रिसदस्यीय समिती उच्चन्यायालयासमोर मांडली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीचा जो काही निर्णय येईल तो दोन्ही पक्षांना मान्य असणार आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीचा नारायण राणेंना पडला विसर..
त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या झालेल्या निलंबनाच्या बाबतीतही सरकारने माघार घेतली आहे. २२ डिसेंबर आणि लांबचे कर्मचारी २३ डिसेंबरपर्यंत कामावर परतल्यानंतर त्यांच्या विरुद्धच्या निलंबन, बडतर्फ व बदलीसारख्या कारवाया मागे घेण्यात येणार आहेत. फौजदारी कारवाईची प्रकरणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मागे घेण्यात येईल, असाही तोडगा संघटना आणि सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत काढण्यात आला आहे. अनिल परब बोलताना म्हणाले, चर्चेच्या दरम्यान आपल्या उर्वरित मागण्यांपैकी आर्थिक मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.
Read also:
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘या’ चार नगरपंचायतीसाठी होणार मतदान; राणे विरुद्ध शिवसेना नेतृत्वाचा लागणार कस
- ‘राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत’
- गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर हेमा मालिनी भडकल्या, म्हणाल्या..
- “टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी”; देवेंद्र फडणवीस यांची मागणी
- मला 50 कोटी द्या, मी घरदारासह जिल्हा सोडतो; भाजप नेत्याच भन्नाट चॅलेंज