सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतींसाठी आता राजकारण चांगलेच पेटू लागले आहे. देवगड जामसंडे, वाभवे-वैभववाडी, कुडाळ व कसई- दोडामार्ग या चार नगरपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. महाविकास आघाडी सरकार विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष इथं बघायला मिळणार आहे.
“जर माझ्या मतदारसंघाततील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”
केंद्रीय मंत्री नारायण राणेंसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे हे या ठिकाणी तळ ठोकून बसले होते. आता या निवडणुकीकरिता मतदान होणार आहे. त्यामुळे याभागात शिवसेना बाजी मारणार की राणे म्हटल्याप्रमाणे ते शिवसेनेचा धुव्वा उडवणार हे आता स्पष्ट होणार आहे. राणेंच्या ताकदीला आव्हान देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक, माजी आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
“भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात”; महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौप्यस्फोट
सर्वोच्च न्यायालायने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत निर्णय दिल्यामुळे नगरपंचायतीच्या ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीमधील ओबीसी जागा वगळता उर्वरित जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत साठी ४० उमेदवार, वैभववाडी- वाभवे साठी ३७, कुडाळ नगरपंचायतसाठी ४१ तर कसई दोडामार्ग साठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चारही नगर पंचायत मध्ये एकूण २८५७५ मतदार मतदान करणार आहेत. काँग्रेस या निवडणुकीत स्वबळावर लढत असल्याने खरी लढत ही भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे.
Read also:
- ‘राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत’
- गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर हेमा मालिनी भडकल्या, म्हणाल्या..
- “टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी”; देवेंद्र फडणवीस यांची मागणी
- मला 50 कोटी द्या, मी घरदारासह जिल्हा सोडतो; भाजप नेत्याच भन्नाट चॅलेंज
- नगरपंचायतीच्या निवडणुकीचा नारायण राणेंना पडला विसर..