मुंबई – हेमा मालीनींच्या गालांवरून मंत्री गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे. मात्र, यावरूनही भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विटदेखील केले आहे. मुख्यमंत्र्यांनी गुलाबराव पाटलांना माफ केले, ही नौटंकी चालणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
“…तर मोदी अन् शाहांना आनंद होईल”; गिरीश बापटांचे कार्यकर्त्यांना आवाहन
“गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केले. ही नौटंकी चालणार नाही. बेलगाम पाटलांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करणार की नाही? हे आधी सरकारनं सांगावे, असा सवाल करत महिलांचा अपमान करणारे पाटलांसारखे मंत्री हे कलंक आहेत. आता त्यांना वाचवणारेही कलंकित झाले आहेत.” अशी टीका वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केलं ?? ही नौटंकी चालणार नाही…
बेलगाम पाटलांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करणार की नाही हे आधी सरकारनं सांगावं.
महिलांचा अपमान करणारे पाटलांसारखे मंत्री हे कलंक आहेत… आता त्यांना वाचवणारेही कलंकित झालेत.. pic.twitter.com/sXMfjpRm4G
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 20, 2021
आमदार, मंत्री झाला तरी महापालिकेत जीव कसा घुटमळतोय; महापौर पेंडणेकरांचा शेलारांना रोखठोक सवाल
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
रस्ते चांगले असावेत असा माझ्या बोलण्यामागचा उद्देश होता, असे स्पष्टीकरणही गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागत आहे. हेमा मालिनीच्या गालांशी तुलना ओघात बोलताना झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Read also:
- पटोले दिल्लीला रवाना, विधानसभा अध्यक्षपदाबाबत हायकमांडशी चर्चा
- आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
- “संजय राऊतांनी शिवसेनेतील बाकीच्यांना जवळजवळ नामशेष केले”; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
- सदावर्ते हे आमचे वकील आहेत, भूमिका पटली नाही तर वकील बदलून टाकू – अजय गुजर
- महादेव जानकारांचा नवा शोध; म्हणाले, शिवाजी महाराजही ओबीसी होते