अहमदनगर – येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक मोठे तरूण नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोते हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत.
महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
गेल्या काही दिवसांपासून थोरात यांच्याशी कोते यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून साईबाबा संस्थानच्या उपाध्यक्षपदाची न मिळालेली संधी यामुळे ते पक्षाला रामराम ठोकणार असे बोलले जात आहे. गेल्या १७ वर्षांपासून कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठेने काम करत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसची धुरा त्यांनी उत्तम सांभाळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांच्यानंतर संग्राम कोते पाटील यांच्या कामाचे जाहीरपणे कौतुकही केले होते.
कोते यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी व युवकसाठी राज्यभर शंभराहून मोर्चे, दीडशेहून अधिक मतदारसंघात बुथ कमिटी बैठका, राज्याचे सात दौरे, सर्व विभागीय मेळावे, १७०० नव्या शाखांची स्थापना आदी कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. मात्र मणक्याच्या त्रासामुळे त्यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये राजीनामा दिला होता. कोते हे साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपदासाठी इच्छुक होते. अजित पवार यांनी त्यासाठी प्रयत्नदेखील केले; मात्र शिवसेना उपाध्यक्षपद देण्यात तयार झाली नाही. तेव्हापासून कोते पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे.
सहकारी चळवळ धोक्यात आल्याचं सांगणारेच आता…; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?
गेल्या काही दिवसांपासून ते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याचे समजते. कोते काँग्रेसमध्ये गेल्यास पक्षाला एक चांगला नवा चेहरा मिळणार आहे. या पक्षप्रवेशामुळे कोते यांना मोठा राजकीय फायदाही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आहे. राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये गेल्यापासून या जागेवर काँग्रेसलाही एक सक्षम उमेदवाराची आवश्यकता आहे. कोते पक्षात दाखल झाल्यास या निवडणुकीसाठी विखे विरुद्ध काँग्रेसला सक्षम उमेदवार मिळेल.
Read also:
- शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- आज निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल; मंत्री नवाब मलिकांचा विश्वास
- आमदार, मंत्री झाला तरी महापालिकेत जीव कसा घुटमळतोय; महापौर पेंडणेकरांचा शेलारांना रोखठोक सवाल
- अमित शहांची मुख्यमंत्र्यांवर टीका, पण प्रकृती स्वास्थ्यासाठीही केली प्रार्थना…