नवी दिल्ली – महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून भाजपसोबत असलेली मैत्री तोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करत सत्ता काबीज केली. यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील संभाव्य युतीबाबत मोठे विधान केले आहे. राजकारणात कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. निवडणूक आली की यामध्ये बदल होत असतात, असे मोठे विधान गडकरींनी केल्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
अजित पवार यांचा निकटवर्तीय असलेला ‘हा’ नेता काँग्रेसच्या वाटेवर
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी गडकरी यांच्या हस्ते अनेक योजनांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना गडकरी यांनी हे विधान केले. पंजाबमध्ये अमरिंदरसिंग यांच्यावर भाजप टीका करत होती. पण आता त्यांच्यासोबत आघाडी केली आहे. भाजपला कोणती मजबुरी होती, असा प्रश्न गडकरी यांना विचारण्यात आला असता गडकरी म्हणाले, राजकारणात कोणासोबतही कधीही आघाड्या होतात, तुटतात. सोबत येतात, सोडून जातात. हा राजकारणाचा एक भाग आहे. राजकारणात याचे उत्तर कधीच मिळणार नाही. इथे कुणीच कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो. निवडणूक आल्यानंतर त्यात बदल होत असतो. काँग्रेसमध्ये अमरिंदरसिंग यांना ज्या प्रकारे अपमानित केले. त्यामुळे ते भाजपसोबत आले आहेत.
शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना: चंपा असो की डंफा सगळे मूग गिळून गप्प बसलेतं – अरविंद सावंत
ही एक चांगली घडामोड आहे. त्यांच्या सहकार्यामुळे भाजप व अमरिंदरसिंग यांच्या आघाडीचे सरकार बनेल, असा दावा गडकरी यांनी केला. लखीमपूर खेरी प्रकरणावरून विरोधकांकडून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर बोलताना गडकरी म्हणाले, हा एक अपघात आहे. या घटनेविषयी विस्तृत माहिती समोर आली आहे. जाणीवपूर्वक कुणीही काही केलेले नाही. याचे राजकारण कुणीही करू नये.
Read also:
- “गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केले. ही नौटंकी चालणार नाही”
- पटोले दिल्लीला रवाना, विधानसभा अध्यक्षपदाबाबत हायकमांडशी चर्चा
- आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
- “संजय राऊतांनी शिवसेनेतील बाकीच्यांना जवळजवळ नामशेष केले”; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
- सदावर्ते हे आमचे वकील आहेत, भूमिका पटली नाही तर वकील बदलून टाकू – अजय गुजर