मुंबई – महाराष्ट्रात आज नगरपंचायत आणि भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी प्रतिष्ठा भंडाऱ्यात पणाला लागलीय. जळगावात एकनाथ खडसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, साताऱ्यात शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर, अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर आणि रवी राणा, अहमदनगरमध्ये कर्जत जामखेडला रोहित पवार आणि राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सह जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच प्रमुख राजकीय पक्ष आहेत. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर महत्त्वाची निवडणूक आहे.
…तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा अन् मग निवडणूका घ्याव्या – काँग्रेस
जळगाव जिल्ह्यातील नगरपंचायतीमध्ये मतदान झाले.मतदारांचा मतदान करण्यासाठी सकाळपासून प्रतिसाद पाहायला मिळत आहे. एकूण 13 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, पालक मंत्री गुलाबराव पाटील गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या 30 जागांसाठी आज मतदान झाले. यामध्ये 16489 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.यामध्ये तिवसा नगरपंचायतच्या 14 जागेसाठी 62 उमेदवार रिंगणात असून भातकुलीच्या 16 जागेसाठी 60 उमेदवार रिंगणात आहेत. तिवसा नगरपंचायतीवर महिला व बालकल्याण मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेस पक्षाची सत्ता होती तर भातकुली नगरपंचायतवर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची सत्ता होती. त्यामुळे या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीचा नारायण राणेंना पडला विसर..
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभुराज देसाई यांना जिल्हा बँकेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. शंभुराज देसाई यांच्याकडून पाटण नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तांनं त्या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्यानं निवडणूक लढवण्यात आली. पाटणमध्ये शंभुराज देसाई विरुद्ध विक्रमसिंह पाटणकर असा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणारी नगरपंचायत म्हणून कर्जतची चर्चा राज्यात झालेली पाहायला मिळाली. कर्जत नगरपंचायतीत आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या सामना आहे. 17 पैकी 13 जागेंसाठी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. कर्जतची निवडणूक ही रोहित पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई तर राम शिंदे यांच्या अस्तिवाची लढाई आहे.
मला 50 कोटी द्या, मी घरदारासह जिल्हा सोडतो; भाजप नेत्याच भन्नाट चॅलेंज
दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 जागांपैकी 13 जागांसाठी आज मतदान झाले. 13 जागांसाठी 43 उमेदवार उभे आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून 13 उमेदवार उभे असून शिवसेनेचे बंडखोर अपक्ष 8 उमेदवार उभे आहेत. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
Read also:
- शिरुर मतदारसंघाची अवस्था म्हणजे… “धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का”
- नगरपंचायत निवडणुकीला हिंसाचाराचं गालबोट; महाविकास आघाडी आणि भाजपा समर्थकांमध्ये तुफान हाणामारी
- ‘वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल’, फडणवीसांची चौफेर टीका
- हिवाळी अधिवेशनासाठी भाजपने कंबर कसली; फडणवीस म्हणातात या सरकारनं लोकशाही संपवली
- राजकारणात कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो; युतीबाबत गडकरींचे मोठे विधान