मुंबई : पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर टीका केली. महाविकासआघाडीला लक्ष केले. हे तीन ऑटोचे सरकार तीन दिशेने जात आहे. त्यांची चाकेही पंक्चर झालेली आहे. निव्वळ धूर फेकत आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान त्यांनी केले. यावर केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकार बरखास्त करा व निवडणुका घ्या. म्हणजे ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल असे, क्रॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
दोन महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या; रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका
पुणे ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. त्यांनी म्हटले होते की, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. परंतु, शिवसेना म्हणते सत्ता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही ती मिळवणारच. एकवेळ तुम्ही मुख्यमंत्री बनलात. मी आजही म्हणतो जर हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि भाजपशी दोन हात करा. तिन्ही पक्षाशी एकसाथ लढायला भाजपचा कार्यकर्ता तयार आहे. महाराष्ट्राची जनता देखील हिशोब करायला तयारच आहे, असे अमित शहा म्हणाले होते.
तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार; आर. आर. पाटलांच्या मुलाच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
सत्तेची गुर्मी असलेले लोकं असे बेताल वक्तव्य करतात. केंद्राच्या विरोधात नागरिकांमध्ये चांगलाच राग आहे. तेव्हा केंद्र सरकारने आधी राजीनामा द्यावा. केंद्रातील व राज्यातील दोन्ही सरकार बरखास्त करा व निवडणुका घ्या. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. लोकशाहीत गृहमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. लोकशाहीचा सन्मान करायला शिका, असेही नाना पटोले म्हणाले.
टीईटी पेपरफुटी प्रकरण: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी 2 कोटी रुपये कॅश आणि सोनं सापडलं
हिंदुत्व आणि हिंदू याबाबत राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. कोरोना काळात गंगा नदीत प्रेत वाहत असताना हिंदुत्व कुठे गेले होते. तेव्हा नाही का आठवले हिंदुत्व. लोकशाहीत जनताच ठरवते चाके कोनाची पंक्चर आहे. सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे. दुसऱ्यांवर बोट उचलण्याची गरज नाही. लोकशाहीत गृहमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
Read also:
- शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- आज निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल; मंत्री नवाब मलिकांचा विश्वास
- आज निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल; मंत्री नवाब मलिकांचा विश्वास
- आमदार, मंत्री झाला तरी महापालिकेत जीव कसा घुटमळतोय; महापौर पेंडणेकरांचा शेलारांना रोखठोक सवाल
- अमित शहांची मुख्यमंत्र्यांवर टीका, पण प्रकृती स्वास्थ्यासाठीही केली प्रार्थना…