मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना त्यांची जीभ घासल्याचे पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका केली आहे. “बिना मुख्यमंत्र्यांचे कुठे राज्य चालत असते का”? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बेळगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; मराठी भाषिकांचा संघर्ष पेटणार, आज बंदची हाक
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभेत बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अचानक रात्री विधानभवनात मारली धडक; विधानभवनाची केली पाहणी
“मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचे जबाबदार आहेत की बारा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी “दोन महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या काहीच सांगू शकत नाही कोणी”, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका केली. “बिना मुख्यमंत्र्याचं कुठं राज्य चालत का?, या 3 महिन्यात कोण्या शिवसेनेच्या मंत्र्याला चार्ज दिला असता तर राज्याचा राज्यकारभार नीट चालला नसत का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. कोरोना काळात केंद्राप्रमाणे राज्यानेही पॅकेज जाहीर करायला हवे होते. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात अन्नधान्याचा साठा किती आहे, त्यावर विचारणा केली होती. देशात दोन-तीन वर्ष पुरेल एवढा साठा असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी कोरोना काळात मोफत अन्न धान्य द्यावे अशी सूचना केली असल्याचे दानवे यांनी सांगितले. कोरोनाचे संकट कायम असेपर्यंत ही योजना सुरू ठेवावी असेही मोदी यांनी म्हटले होते, असेही दानवे यांनी सांगितले.
Read also:
- “ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील”; एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना दाखवला आरसा
- ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली
- आम्ही आगामी नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडवणार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भीष्मप्रतिज्ञा
- “बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य आले”; मनिषा कायंदेंकडून गुलाबराव पाटलांची पाठराखण
- “जर माझ्या मतदारसंघाततील हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”