पुणे : राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटो रिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर असून हे सरकार हलतही नाही आणि चालतही नाही. फक्त धूर सोडतंय, अशा शब्दात भाजप नेते अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली.
महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबीच्या जाळ्यात..!
महागाई वाढली महागाई वाढली अशी ओरड होत होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सगळेच ओरड करू लागले होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेलवरचे दर कमी केले. तसंच राज्यांनाही इंधनावरचे दर कमी करण्याचं आवाहन केलं. भाजपशासित राज्यांनी दर कमी केले. मात्र महाराष्ट्र सरकारने ऐकलंच नाही बहुतेक, त्यांनी इंधनाचे नाही तर दारूचे दर कमी केले, असं म्हणत अमित शाह यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं लोकमान्य टिळक म्हणत असत. मात्र शिवसेना म्हणते सत्ता मिळवणं हा आमचा जन्मसिद्ध आहे, त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. आज आव्हान देतो. राजीनामा द्या, तिन्ही पक्ष एकत्र लढा भाजपचा कार्यकर्ता तयार आहे. सिद्धांत सोडून केलेलं राजकारण कुणालाच आवडत नाही. महाविकास आघाडीच्या अंताची सुरूवात पुण्यापासून करा असंही आवाहन अमित शाह यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरेत हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा, अन्…; अमित शहांच मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
विमानतळ वाढवणं, मेट्रोचे तीन मार्ग, बसेस देणं, मुळा मुठा नदी संवर्धनासाठी निधी देणं, स्टार्ट अपला प्रोत्साहन यासारखी विकासकामं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पुण्याच्या विकासात मोदी सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रासह भारत देश कोरोनामुक्त होवो आणि आत्मनिर्भर भारत हे आपलं ध्येय लवकरात लवकर पूर्ण होवो असं मागणं आपण दगडूशेठ गणपतीपुढे मागितलं आहे असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
Read also:
- आम्ही आगामी नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडवणार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भीष्मप्रतिज्ञा
- “बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य आले”; मनिषा कायंदेंकडून गुलाबराव पाटलांची पाठराखण
- “जर माझ्या मतदारसंघाततील हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”
- हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- …तेव्हा फडणवीसचं मुख्यमंत्री होतील असं ठरलं होतं, शिवसेनेनेच सत्तेसाठी वचन मोडले – अमित शहा