सांगली : सांगलीत कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत, यावेळी राष्ट्रवादीच्या प्रचार सांगता सभेत रोहित आर.आर. पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. निवडणुकीचा निकाल १९ तारखेला स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे, हे मला माहीत आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे. जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत, त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत, हे माझ्या पुढे येऊन सांगावं,’ असं आव्हान रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सांगता समारंभ प्रसंगी बोलताना दिले.
“जर माझ्या मतदारसंघाततील हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”
तर निवडणुकीचा निकाल १९ तारखेला स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्यांच्या हाती १५ वर्षे सत्ता होती. नगरपंचायत होती आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आले आहेत. रोहित पाटील यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
Read also:
- दोन महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या; रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका
- “ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील”; एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना दाखवला आरसा
- ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली
- आम्ही आगामी नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडवणार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भीष्मप्रतिज्ञा
- “बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य आले”; मनिषा कायंदेंकडून गुलाबराव पाटलांची पाठराखण