मुंबई – राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. नागपूर येथे दरवर्षी पार पडणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा पहिल्यांदाच मुंबई येथे पार पडत आहे. दिवसाच्या अधिवेशनात ओबीसी आरक्षण, टीईटी, म्हाडा व आरोग्य विभागातील पेपरफुटी, मराठा आरक्षण, शेती नुकसान भरपाई, ड्रग्ज प्रकरण, एसटी महामंडळाचे विलीनीकरण आदी प्रमुख मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे.
आमचे ३०-३५ आमदार होऊ द्या, मराठ्यांना आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो; महादेव जानकरांची ग्वाही
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या अभूतपूर्व गोंधळ झाला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. या मुद्द्यावरुन आज भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी भाजपने अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे स्वतंत्र अर्ज केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी आमदरांचे निलंबन मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याबद्दलच विनंती पत्र आज प्रत्येक आमदारांने स्वतंत्रपणे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिलं असल्याची माहिती समोर आली आहे.
“गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केले. ही नौटंकी चालणार नाही”
पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेले भाजपचे १२ आमदार कोण?
1. आमदार अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व विधानसभा)
2. आमदार राम सातपुते (माळशिरस विधानसभा)
3. आमदार आशिष शेलार (वांद्रे पश्चिम विधानसभा)
4. आमदार संजय कुटे (जळगाव जामोद विधानसभा)
5. आमदार योगेश सागर (चारकोप विधानसभा)
6. आमदार किर्तीकुमार बागडिया (चिमूर विधानसभा)
7. आमदार गिरीश महाजन (जामनेर विधानसभा)
8. आमदार जयकुमार रावल (सिंदखेडा विधानसभा)
9. आमदार अभिमन्यू पवार (औसा विधानसभा)
10. आमदार पराग अळवणी (विले पार्ले विधानसभा)
11. आमदार नारायण कुचे (बदनापूर विधानसभा)
12. आमदार हरीश पिंपळे (मूर्तीझापूर विधानसभा)
Read also:
- काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर; नाना आणि भाईंमधील अबोल्याच्या सर्वांना आला अंदाज..
- आता सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचचं नाव बदलणार का? निलेश राणेंचा संतप्त सवाल
- “मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नाही”; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी
- ‘शहा मस्त तर त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त’; शहांच्या दौऱ्यावरून शिवसेनेने केले भाजपला टार्गेट
- हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची पहिलीच मागणी अजित पवारांनी केली मान्य..