मुंबई : आपल्या मागण्यांसाठी संप करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था ही शेतकऱ्यांसारखी झाली आहे. हे कर्मचारी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याचे वक्तव्य संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले. उच्च न्यायालयात बुधवारी एसटी संपावर सुनावणी झाली. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयासमोर ४२ हजार कर्मचाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र आहे. ते सहकाऱ्यांच्या आत्महत्यांमुळे दुखवट्यात आहेत. सर्व आत्महत्या करण्यासारख्या मनस्थितीत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब हे वारंवार कारवाईचा इशारा देत आहेत. अनेकांवर कारवाई झाली, असे सदावर्ते यांनी सांगितले. आमचा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा कोणत्याही कर्मचारी संघटनेशी आता संबंध उरला नसल्याचे सदावर्ते यांनी स्पष्ट केले.
सत्ताधाऱ्याच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार..!
यानंतर एसटी महामंडळाच्या वकिलांनीही न्यायालयात युक्तिवाद केला. एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची एकच मागणी बाकी आहे. उर्वरित सर्व मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत, असे एसटी महामंडळाच्या वकिलांकडून सांगण्यात आले.
तत्पूर्वी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बुधवारपर्यंत कामावर पुन्हा रुजू होण्याची मुदत देऊ केली होती. त्यानंतरही कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत तर सरकारकडे प्लॅन बी तयार असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, सरकारचा प्लॅन बी नेमका काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने न्याय मिळेल, असे सांगत आहेत. ते कामगारांना चुकीच्या मार्गावर घेऊन चालले आहेत. संप सुरुच राहिला तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल, ही बाब सदावर्ते यांना वकील म्हणून ठाऊक आहे.
तीन दिवसांच्या विधीमंडळ अधिवेशनासाठी आमदार महेश लांडगेंचे तीन महत्त्वाचे मुद्दे..!
त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते ‘संपा’ऐवजी दुखवटा हा शब्द वापरत आहेत. ते कधीपर्यंत कामगारांचे नुकसान सुरु ठेवणार आहेत, असा सवाल अनिल परब यांनी विचारला. अगोदरच एसटी १२ हजार कोटींच्या तोट्यात आहे. आता संपामुळे त्यामध्ये आणखी ६ हजार कोटींची भर पडली आहे. अशाने उद्या एसटी जगलीच नाही तर तुमचे विचार कशाचा जोरावर चालणार, असा रोकडा सवाल अनिल परब यांनी संपकऱ्यांना विचारला होता.
Read also:
- विधानसभेत उडाल्या `क्राॅस कनेक्शन`च्या ठिणग्या; नितीन राऊतांना टार्गेट करताना पटोलेंनी दिली फडणवीसांना साथ
- परीक्षा घोटाळ्यावरून फडणवीस-पटोलेंमध्ये वाद; फडणवीस म्हणाले यंत्रणा सडलेली, पटोले म्हणाले कराचं चौकशी..
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींचा फोन..
- अखेर भास्कर जाधवांना देवेंद्र फडणवीसांनी झुकवलं; भर सभागृहात जाधवांनी मागितली माफी
- विधानसभेत राडा! भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल, फडणवीसांकडून निलंबनाची मागणी!