मुंबई – अभिनेत्री कंगना रनौत आणि वादग्रस्त वक्तव्य यांचे एक वेगळे नाते आहे. कायम काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा कंगना रनोत नेहमीच प्रयत्न करत असते. नुकतंच तिने देशाला खार स्वतंत्र हे २०१४ नंतर मिळालं, त्याआधी १९४७ला मिळली ती भीक होती ” असं वक्त्यव्य केलं होतं. या वक्तव्यावरून बराच गदारोळ माजला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द कारण्याचो घोषणा केली आहे. या तीन कृषी कायद्यांवरून मागील काळात बराच संघर्ष बघायला मिळाला होता. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु ठेवले होते. यामध्ये कित्येक शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता.
भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे; अमरावती हिंसाचारावरून पवार बरसले
अखेरीस सरकारने माघार घेत हे कायदे रद्द केले आहेत. हे कायदे रद्द केल्याची घोषणा करताना पंतप्रधान मोदी यांनी आम्हीच तुम्हाला सांगताना कुठेतरी कमी पडलो अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आता शेतकऱ्यांनी आंदोलन न करता आपापल्या घरी जावे, नवीन सुरुवात करावी. शेती करण्यास सुरुवात करावी असं देखील म्हटलं आहे.
परमबीरसिंह ‘वॉण्टेड’ लिस्टमध्ये! ३० दिवसांत पोलिसांसमोर हजर न झाल्यास…
हे सगळं झाल्यानंतर मोदींवर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. नेत्यांसोबतच मोदींच्या काही मित्रांनी देखील त्याच्यावर टीकेचा भडीमार उठवला आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रनोतचा देखील समावेश आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय अत्यंत लज्जास्पद अन् दुःखद असल्याचे सांगून हा निर्णय चुकीचा असल्याचे कंगनानं म्हटलं आहे. मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काहीच क्षणात कंगनाने एक इन्स्टास्टोरी शेअर केली. यात तिने मोदींच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. ‘दु:खद, लज्जास्पद… अयोग्य… संसदेत बसणा-या लोकांनी निवडून दिलेल्या सरकारऐवजी सस्त्यावर बसणारे लोक कायदे बनवणार असतील तर हा सुद्धा ‘जिहादी’ देश आहे. ज्यांना हे हवंय, त्यांचं अभिनंदन,’ असे कंगनानं आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये म्हटलं आहे.
Read Also :
- एसटी कर्मचाऱ्यांचा पुढचा मोर्चा शरद पवार यांच्या घरावर; वंचित आघाडीचा इशारा
- ‘पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसेल म्हणून मोदींनी कायदे रद्द केले’; शरद पवारांचा सणसणीत टोला
- “कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”
- ‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कृषी कायद्यावर प्रतिक्रिया
- असं काय झालं की तीन कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागली?