मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हे पाहता वंचित बहुजन आघाडीने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
नाना पटोले पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानपरिषद निवडणूकीवर चर्चा?
आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग नोंदविला होता. सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एसटीचे शासनात विलीनीकरण नाही झाले तर पुढचा मोर्चा हा शरद पवार यांच्या घरावर काढण्यात येईल,असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.
…तर आम्ही बारामतीला गेल्यावर शरद पवारांनी अडचण नसावी – नाना पटोले
एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला जामखेड तालुक्यातील तेलंगशी, रत्नापुर, धनेगाव, सोनेगाव, पाटोदा, लोणी, राजुरी, डोबेवाडी, नायगाव, जवळा, खांडवी, फक्राबाद आदी ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पाठिंबा दर्शवला.आहे. तसेच यासंदर्भांतील निवेदन कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींच्या हस्ते जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना सुपूर्द करण्यात आले.
Read Also :
- ‘पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसेल म्हणून मोदींनी कायदे रद्द केले’; शरद पवारांचा सणसणीत टोला
- “कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”
- ‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कृषी कायद्यावर प्रतिक्रिया
- असं काय झालं की तीन कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागली?
- ‘अधिकाऱ्यांना मॅनेज करून दाऊदचे झाले ज्ञानदेव’; मंत्री मलिकांचा पुन्हा गौप्यस्फोट