मुंबई : महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत नाना पटोले विधानसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
“नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. प्रत्येक पक्षाचे नेते आपला पक्ष निवडून आणण्यासाठी मार्ग काढण्यात दंग आहेत. विधान परिषदेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी नाना पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, या सहा जगांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, याच जागेसाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती. आता पुन्हा एकदा पटोले यांनी सहा जागांच्या विधानसभा निवडणुका घेण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र, पटोले यांनी फडवीसांकडे तशी मागणी केली असेल तर भाजपा त्यासंदर्भात काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार? जात प्रमाणपत्राची पडताळणी सुरू
- विदर्भ दौऱ्या दरम्यान शरद पवारांना आली अनिल देशमुखांची आठवण; म्हणाले..
- गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, त्यांना विशेष सुरक्षा द्या; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- खोट्या केसमध्ये वडिलांना तुरूंगात टाकलं, भाऊ बेपत्ता आहे, आम्हाला न्याय द्या; तरूणीने टाहो फोडला
- “अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”